उपायांसाठी २३ तारखेची वाट कशाला पाहताय ः शरद पवार

शरद पवार
शरद पवार

म्हसवड, जि. सातारा  : माण, खटावमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली असून, येथे पाणी व चाऱ्याची गरज असताना महसूल प्रशासन २३ तारखेची वाट बघत बसले आहे. माणुसकी म्हणून महसूल प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही? ही सर्व जबाबदारी महसूल खात्याची असून त्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालावे व दुष्काळी उपाययोजनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. 

रविवारी म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की माण तालुक्‍यात ज्या ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे पाण्याची कमतरता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उपलब्ध असलेले पाणीही स्वच्छ नाही. मजूर आहेत पण रोजगार हमीची कामे सुरू नाहीत. खटावमध्ये ५१८, तर माणमध्ये २५२ मजूरसंख्या असून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार हमीच्या कामांची गरज आहे. ती सुरू करावीत, अशी अपेक्षा आहे. माण तालुक्‍यात चारा छावण्या मागणीचे ८६ अर्ज आलेले असताना प्रत्यक्षात २० छावण्याच सुरू आहेत. आणखी छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. जिल्हा प्रशासनाकडून एका जनावरावर ९५ रुपये खर्च केले जात आहेत. मुळात चाऱ्याचा खर्च, पाणी आणण्याचा खर्च, जनावरांना पेंड आणि जनावरांसोबत राहणारी व्यक्ती या सर्वांच्या खर्चाची पूर्तता करायची असेल तर एका जनावरामागे ११५ रुपये खर्च येतो. त्यामुळे ९५ रुपये ही रक्कम पुरेशी नाही. शासनाकडून जनावरामागे मिळणारा खर्च वाढवून दिला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com