रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद पवार

शरद पवार
शरद पवार

सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात अण्णा यशस्वी झाले. त्यामुळे रयतचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. आता आधुनिक काळात संशोधनाची भावना नव्या पिढीत रुजली पाहिजे, यासाठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून काम सुरू आहे. वैज्ञानिक क्षेत्रात देशाने प्रगती करताना चांद्रयान ९८ टक्के यशस्वी केले आहे. भविष्यात भारताचा तिरंगा घेऊन मनुष्य चंद्रावर उतरेल. त्यामध्ये रयतेचा विद्यार्थी सहभागी असेल. रयतच्या योगदानातून नवा इतिहास घडेल, असा विश्‍वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्था सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्रा. डॉ. विजयसिंह सावंत, वैभव नायकवडी, अरुण आंधळे,  विलास महाडिक यांची प्रमुख उपस्थित होती. प्रारंभी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. श्री. पवार म्हणाले, त्या काळी त्यागाचा विचार त्या काळच्या पिढीत उतरविण्यात अण्णा यशस्वी झाले. अनेक क्षेत्रांत आज रयतचे विद्यार्थी झाल्याचे पाहायला मिळते. सध्याचा काळ आधुनिकतेचा आहे. त्या आधारे संशोधनाची भावना सध्याच्या पिढीत रुजविला पाहिजे, यासाठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून हे काम होत आहे. शास्त्रीय दृष्टिकोन नवीन पिढीत कसा येईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पुढे गेले पाहिजे, यावर काम सुरू आहे. त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले विज्ञान परिषदेत काम करत आहेत. यातून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली पिढी तयार होणार आहे. सर्वच क्षेत्रात कर्तृत्व दाखविताना देशाला अभिमान वाटावे, असे विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडत आहेत.  ‘‘सध्या चांद्रयान मोहीम ९८ टक्के यशस्वी झाली. यामध्ये सामान्य कुटुंबातून येऊन शास्त्रज्ञ झालेल्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. त्यामुळे जगाच्या वैज्ञानिक क्षेत्रात भारताचे नाव पहिल्या पाच देशांत पोचले आहे. नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टी संस्थेच्या माध्यमातून देत राष्ट्रहितासाठी कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचे काम या संस्थेतून होत असताना, आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे स्वस्थ बसून चालणार नाही,’’ असा सल्लाही त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com