मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या योजना पोचल्याच नाहीत ः शरद पवार

sharad pawar
sharad pawar

मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीयांना दुय्यम वागणूक दिली गेली. गेल्या पाच वर्षांत सरकारच्या अनेक योजना मागासवर्गीयांपर्यंत पोचल्याच नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २४) येथे केला. राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विविध समाज घटकांना जोडून पक्ष बळकटीचे प्रयत्न चालवले आहेत. अल्पसंख्याक विभागाच्या पाठोपाठ राष्ट्रवादीने सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना पवार यांनी ज्या समाज घटकांवर अन्याय होतो त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण करावे, असे आवाहन पवार यांनी केले. केंद्रातील सरकारचे मागासवर्गीय समाजाकडे लक्ष नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते ठरावीक समाजाचा विचार करून निर्णय घेत आहेत, असा आरोपही पवार यांनी भाजपचे नाव न घेता केला. राज्यात आज तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या परिवर्तनासाठी आपण काम केले पाहिजे, असे पवार म्हणाले. आपल्या पक्षाने लहान घटाकांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा अशा गोष्टीत बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांची जयंती दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकात साजरी होईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com