उद्धव ठाकरेंनी पाच वर्षे काय केले? : शरद पवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाला नसलेला भाव,राज्यातील विकास या प्रश्‍नांकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षांत या सरकारने कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत. - शरद पवार,राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
शरद पवार
शरद पवार

जळगाव  : राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात - बारा कोरा करू अशी घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत सत्तेत असताना काय केले, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली आहे. परंतु गेल्या पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात त्यांनी काय केले? त्यावेळी का नाही केला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा? पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या कामांची माहिती  देऊन त्यात अधिकचे काय करायचे हे सांगितले तरच लोकं त्याकडे लक्ष देतात, अन्यथा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com