शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट कर्जमाफीची गरज : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती संकुचित आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती येते. त्यामुळे समाजात मानहानीच्या भीतीने शेतकरी आत्महत्या करतात. पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी उद्योगपतींच्या मागे उभे राहते. केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेऊन फेडल्याचा आरोप करत, शेतकरी वाचवायचा असेल तर सरसकट कर्जमाफी गरजेची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अंबाजोगाई येथे शुक्रवारी (ता. १८) आयोजित प्रचार सभेत श्री. पवार बोलत होते. उमेदवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, माजी मंत्री पंडितराव दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, नगराध्यक्षा रचना मोदी अदी या वेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर उत्तर नसल्याने ३७० कलम पुढे केले जात आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची गरज आहे. परळीची चर्चा राज्यात असून ही जागा जाणार असल्याचे लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणल्याचेही श्री. पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com