अत्यल्प, अल्प भूधारकांचा विचार करण्याची गरजः शेखर गायकवाड

shekhar gaikwad
shekhar gaikwad

पुणे: अन्न विस्तार यंत्रणा व संशोधन संस्था यांच्या प्रयत्नांमुळे भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. शिवाय आता देश शेतीमाल निर्यातही करत आहे. या स्थितीत देशात ८० टक्क्यांहून अधिक संख्या असलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करणेही गरजेचे आहे. त्यासाठी विस्तार यंत्रणांनी कार्यपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त झाले आहे. स्थानिक गरजा व समस्या, लोकसहभाग, पीक पद्धती, जोडधंदा यावर आधारित तंत्रज्ञानाचा प्रसार हाच शाश्वत शेतीचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमतर्फे शाश्वत कृषी विकास आणि अन्न सुरक्षा या विषयावरील तिसरी राष्ट्रीय परिषद १० ते ११ जानेवारी रोजी आयोजित केली होती. या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गायकवाड बोलत होते. या वेळी मेरा किसानचे संस्थापक आणि सीईओ प्रशांत पाटील, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका सुनीता मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. वसंत पवार, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आदी उपस्थित होते.  शेखर गायकवाड म्हणाले, की अन्न सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा भाग शेतीच्या शाश्वत विकासामध्ये आहे. अन्नाची निर्यात करताना अन्न पदार्थांचे उच्च मानांकन राखावे लागत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून अन्न पदार्थांचे जागतिक स्तरावरील मानांकन राखावे. युरियाचा वापर कमी करून जमिनीचा पोत सांभाळावा. राज्य सरकार नेहमीच शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. साखर उद्योगात मोठे बदल होत आहे. अन्न वितरण व्यवस्था बळकट करावी लागणार असून याद्वारे नागरिकांनी पोषक अन्न द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जमिनीच्या वादाचे अऩेक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतात. यासाठी विद्यार्थ्यांनी काम करावे. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, शेतीसह इतरही क्षेत्राचा शाश्वत विकास व्हावा. देशाचा विकास होत असताना शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जबाबदारी आपली सर्वांची आहे. मानवता विकासासाठी काम केलेल्या संताच्या विचारातून वन आणि शेती विकासासाठीची कामे करावी लागणार आहे. ऋषी आणि कृषी संस्कृती वाढली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा. कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी प्रास्तविक केले. डॉ. प्रशांत पवार, प्रा. प्राची आहिरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. करूणा गोळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com