सांगली जिल्ह्यात मेंढपाळ दुष्काळाने पिचला

मेंढपाळ
मेंढपाळ

सांगली ः आटपाडी आणि जत, तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व्यवसाय केला जातो. अनेक ठिकाणी मेंढ्यांचा खांड पाहावयास मिळतो आहे. उपजीविकेचे साधन या मेंढ्यांवर कुटुंब अवलंबून आहेत. मात्र चाराटंचाईमुळे मेंढपाळ व्यवसाय संकटात सापडला आहे.  दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी आणि जत तालुक्यात प्रामुख्याने मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. वास्तविक पाहता याच पट्ट्यातील आटपाडी, जत, खानापूर, तासगाव या पाच तालुक्यांत सुमारे ३ लाख ६६ हजार ३६६ शेळ्या मेंढ्या आहेत. या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालविला जातो. वास्तविक पाहता मेंढपाळ हे भटकंती करून दोन पैसे मिळवतात. परंतु गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही, दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत.  मोकळ्या रानात चारा नाही, तर डोंगरावरील खुरटं गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडे झुडपे सुकून गेली आहेत, झुडपांची पाणेसुद्धा वाळून गेली आहेत. झाडा झुडपांना राहिलेत त्या वाळक्‍या काटक्‍या. मग दिवसभर मेंढ्या कुढं फिरवायच्या असा पश्न मेंढपाळांना पडला आहे. चारा विकत घ्यायचा म्हटले तर परवडत नाही. चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. आणखी दोन महिने काढायचे कसे या विवंचनेत मेंढपाळ व्याकूळ झाला आहे. 

मेंढ्या विकून चालू आहे प्रपंच पावसाअभावी शेतात काहीच आलं नाही. मुलांच शिक्षण आणि घर खर्च तरी चालला पाहिजे. त्यासाठी पैसे कुठून आणायचा असा प्रश्न आहे. त्यातच गावात कामही नाही. त्यामुळे शेळ्या मेंढ्या विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com