शेतीमाल १०० टक्के नियमनमुक्त करा ः शेतकरी संघटना

शेतीमाल १०० टक्के नियमनमुक्त करा ः शेतकरी संघटना
शेतीमाल १०० टक्के नियमनमुक्त करा ः शेतकरी संघटना

जळगाव ः शेतीमाल १०० टक्के नियमनमुक्त करावा, शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे धुळे व जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन संबंधित जिल्हा प्रशासनाला सादर केले. धुळे येथे संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशीकांत भदाणे, माजी अध्यक्ष आत्माराम बळिराम पाटील, शांतीलाल दामोदर पाटील, नारायण माळी, निंबा परशुराम जाधव आदींनी या आंदोलात सहभाग घेतला. तर जळगाव येथे संघटनेचे माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कडूअप्पा पाटील, दगडू शेळके, नाना पाटील, ईश्‍वर लिधुरे आदींनी निवेदन सादर केले.  निवेदनात म्हटले आहे, की शासनाने मध्यंतरी अधीवेशनात शेतमाल नियमनमुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु त्यावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय शासनाने घेतला नाही. नंतर याबाबत हमाल माथाडी संघटना, शेतकरी संघटना, व्यापारी, शेतकरी आदींसोबत चर्चा करून हा प्रस्ताव सुधारित करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. परंतु निर्णय अजूनही झालेला नाही. शेतीमालावर शुल्कवसुलीच्या तक्रारी येतच आहेत. बाजार समित्या या संदर्भात नियंत्रण आणायला तयार दिसत नाहीत. खरेदीदाराला कुठेही शेतीमाल खरेदीची सूट द्यावी, त्याच्याकडून कुठलेही शुल्क आकारू नये. सेस रद्द करावा. बाजार समितीत शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास, मारहाण यासंबंधी पोलिस बंदोबस्त बाजार समितीत असावा आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com