सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही : अजित पवार

सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही : अजित पवार
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही : अजित पवार

पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक कळत नाही. हे सरकार प्रचंड असंवेदनशील आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून (ता. १९) पैठण येथून सुरवात झाली. बाळानगर येथे झालेल्या सभेत श्री. पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.

यावेळी श्री.पवार म्हणाले, की हे सरकार खूप असंवेदनशील आहे. पुरात माणसांचे प्राण गेले आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे? महाराष्ट्रावर आज भीषण संकट आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली, सातारा, कोल्हापूरात काम करत आहेत. आम्हीही शक्यतोपरी मदत करत आहोत. विस्कटलेले संसार उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीत असलेल्या माणसाला आपल्याला मदत करायची आहे. मत परिवर्तनातून समाजपरिवर्तन हा संदेश संत एकनाथ महाराज यांनी दिला होता. राज्यात सुराज्य आणण्यासाठी आता सरकार विरोधातील रागाचे मतांमध्ये परिवर्तन करून आपल्याला समाजपरिवर्तन करावे लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com