नाशिक : राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांसह उपबाजार आवार, शासकीय गोदाम, मालधका व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.२६) लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामगार नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्य बाजार नाइलाजाने बंद ठेवण्यात आले होते. माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन, सहकार, गृह व नगरविकास यांसह अन्य खात्यांकडे प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार व संबंधितांकडे अनेकदा पाठपुरावा केला, निवेदने सादर केली; मात्र प्रलंबित प्रश्नांकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी; अन्यथा पुढील तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही देण्यात आला; तसेच इतर प्रलंबित मागण्यांची सोडवणूक शासनाकडून तात्काळ व्हावी, असे संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी सांगितले. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.