पुणे : रेशीम उत्पादकांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, रेशीम संचालयाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यापुढे रेशीम उत्पादकांना बारामतीत रेशीम कोषाची विक्री करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांचा वेळ आणि पैसा यांची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांतील अनेक शेतकरी रेशीम उद्योग करतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाची विक्रीच्या सुविधा नसल्याने विक्री करण्यास अडचणी येत होत्या. अनेक शेतकरी रेशीम कोष कर्नाटकात घेऊन जाऊन विक्री करत होते. तेथील व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक, कमी दर, राज्यात चांगली नसलेली विक्रीची सुविधा अशा विविध कारणांमुळे शेतकरी रेशीम उद्योगाकडे फारसे वळत नव्हते. पुणे जिल्ह्यात जवळपास साडेपाचशेहून अधिक, तर पश्चिम महाराष्ट्रात सुमारे दोन ते तीन हजार एकरांवर रेशीम उद्योग शेतकरी करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रेशीम उत्पादनवाढीसाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उभी राहावी म्हणून पुणे जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला अखेर नागपूर येथील रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी मंजुरी दिली आहे.
१५ जानेवारीपासून बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची खरेदी करण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी प्रियंका गणाचार्य यांनी दिली. रेशीम संचालनालयाने बाजार समितीला घातलेल्या अटी ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.