राज्यात साठ लाख रोजगारनिर्मितीचा दावा खोटा ः विजय वडेट्टीवार

राज्यात साठ लाख रोजगारनिर्मितीचा दावा खोटा 
राज्यात साठ लाख रोजगारनिर्मितीचा दावा खोटा 

मुंबई ः राज्यात पाच वर्षांत ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दाव्याचा समाचार घेताना वडेट्टीवार पुढे म्हणाले, की भाजप-शिवसेना सरकार नियोजनशून्य, दिशाहीन धोरणांमुळेच पाच वर्षांत गुंतवणूक व रोजगार निर्मितीमध्ये सपशेल अपयशी ठरले असून, विधानसभा निवडणुकीत तरुणवर्गाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही फसवी व दिशाभूल करणारी आकडेवारी देण्याचा आटापिटा करत आहे. मतांच्या लाचारीसाठी तरुणवर्गाच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. प्रत्यक्षात नोकरी मिळत नाही म्हणून गावागावांत बेरोजगारांच्या फौजा असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे या औद्योगिक भागातील नामांकित वाहन उद्योगातून उत्पादन बंद करून कामगार कपात केली आहे. या कंपन्यांशी निगडित असलेले शेकडो छोटे उद्योगही बंद करावे लागले असल्याने लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. 

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पना अपयशी ठरल्या असून, लाखो रोजगार देण्याचे सरकारी दावे हवेतच विरले आहेत. मग हे रोजगार दिले तर कुठे, सगळीकडे कामगार कपात होत असताना उद्योगमंत्री कशाच्या आधारावर ६० लाख रोजगारनिर्मितीचा दावा करत आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांची स्थिती तर यापेक्षा भीषण आहे, असे असताना रोजगारनिर्मितीचा दावा खोटा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com