अंबड, जि. जालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला. आता कशीबशी उगवलेली रब्बी पिकेही हरिण, काळवीट अशा वन्यप्राण्यांकडून फस्त होत आहेत. या संकटामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
अंबड तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठा फटका पिकांना बसलेला आहे. कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद पिकांची दाणादाण पावसामुळे उडाली. त्यातच कीड, रोगराईमुळे पिके हातची गेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. त्यातच अनेकांनी शेतात ज्वारीची पेरणी केली. ज्वारीचे पीक उगवले; मात्र अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
शिवाय बदलत्या वातावरणाचा हरभरा, तुरीच्या पिकांवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा स्थितीतच सध्या कोवळ्या असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर रानडुक्कर, हरिण, काळविटांची नजर पडली आहे. ठिकठिकाणी वन्यप्राण्यांचे कळप कोवळी पिके फस्त करीत आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकरी याबाबत श्रीमंतराव धुले म्हणाले, ‘‘परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बी पिकांची हरिण, काळवीट, रानडुकरांकडून नासाडी होत आहे. केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.