रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांचे दुर्लक्ष

मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते.
Small traders neglect fish farming in Ratnagiri
Small traders neglect fish farming in Ratnagiri

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे आठ लाखांचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. मात्र, मत्स्य बीज तयार न होते, तलावात सूक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणी नसणे आणि मासे पकडण्यासाठी कामागार न मिळणे, अशा अनेक अडचणींमुळे गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उतरती कळा लागली आहे. यंदा फक्त २३ तलावांचा लिलाव होऊन पावणे चार लाखांच्या महसुलावर समाधान मानावे लागले आहे.  

जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होते.

त्यामध्ये त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्टरी ३०० रुपये या प्रमाणे तलावाचा लिलाव होतो. सुमारे १०० ते १२० हेक्टरचे तलाव आहे. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक त्यामध्ये माशाचे बीज सोडले जाते. मात्र, बहुतेक तलाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दऱ्या खोऱ्यातील पाणी वाहत राहते. यामुळे तलाव भरून उलटून वाहत राहत. त्यामुळे बहुतांशी पिल्लं वाहून जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्यक असणारे सूक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खाऱ्या पाण्यातील माशांप्रमाणे चव लागत नाही. काटे भरपूर असल्याने त्याची मागणी अल्प आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीपुढे अशी अनेक संकट आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तलावातील मत्स्य शेतीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे. यंदा फक्त २३ तलावांचाच लिलाव झाला आहे. यातून मत्स्य खात्याला पावणे चार राख महसूल मिळाला आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उभारी देण्यासाठी आता प्रयोगशील व्यावसायिकाची गरज आहे. तरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढीला लागणार आहे. अन्यथा हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com