सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात

जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षण करून घेण्यासाठी जागृत झाले आहेत. त्यांना माती परीक्षणाचा अहवाल दिला जातो. त्या अहवालात शिफारस केल्याप्रमाणे खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे. तरच जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होईल. - अमित कवठेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, सांगली.
सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात
सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात

सांगली ः रासायनिक खते आणि पाण्याचा अर्निबंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्‍यात येऊन शेती आणि शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा मृदा चाचणी विभागात जिल्ह्यात गतवर्षी ५६ हजार माती तपासण्यासाठी नमुने आले होते. त्यापैकी ४१ मातीचे नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये स्पुरद, नत्र, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे जिल्हा मृदा चाचणी विभागाने काढलेल्या अहवालात नमद केले आहे. परिमाणी जिल्ह्यातील शेती धोक्‍यात आली आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस, फळबाग, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. जमिनीची भूक न ओळखता शेतकऱ्यांकडून केवळ पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो आहे. मात्र, उत्पादन घेताना जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षण करण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. त्याचा परिमाण उत्पादनावर होत होता. त्याचप्रमाणे शेतीचे आरोग्यदेखील धोक्‍यात आले होते.   गेल्या वर्षभरापासून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागाने माती परीक्षण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी सुमारे ५६ हजार शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्यासाठी पुढे आले. त्यापैकी ४१ हजार मातीचे नमुने तपासले आहेत. त्यामध्ये पालाशचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. तर स्पुरद, नत्र, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे. माती परीक्षणाचा अहवालात कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे, अशा शिफारशीदेखील दिल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार खतांची मात्रा दिली पाहिजे, तरच जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होईल. शिफारशीचा वापर केला नाही तर दुष्काळी भागासह नदीकाठच्या भागातील मोठ्या प्रमाणात शेतीचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होते आहे.  माती परीक्षणाकडे वाढला कल जिल्ह्यातील बरेचशे शेतकरी विविध पिकांच्या उत्पादनात विक्रमी उत्पादन घेताना दिसत आहेत. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांची आकडेवारी पाहिली, तर माती परीक्षणासाठी शेतकरीसंख्या अत्यल्प होती. मृद चाचणी विभागाने शेतकऱ्यांच्यात माती परीक्षण केले पाहिजे, अशी जनजागृती गावोगावात केल्याने शेतकरी माती परीक्षणासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सुपीकता निर्देशांक

तालुका नत्र     स्फूरद     पालाश     कर्ब
मिरज भरपूर   भरपूर     भरपूर     भरपूर    
वाळवा     कमी     मध्यम     भरपूर     भरपूर
शिराळा     भरपूर     भरपूर     भरपूर     भरपूर    
तासगाव     कमी     भरपूर     भरपूर     भरपूर    
खानापूर  कमी     मध्यम     भरपूर     भरपूर    
आटपाडी    कमी     कमी     भरपूर     भरपूर    
कडेगाव     कमी     मध्यम     भरपूर     मध्यम
पलूस     मध्यम     भरपूर     भरपूर     मध्यम    
जत     मध्यम     कमी     भरपूर     मध्यम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com