अकोला ः कच्चा मालाच्या वाढलेल्या किमती तसेच कोरोना विषाणूच्या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायातील अडचणी वाढल्या आहेत. याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना बसत आहे. अशा स्थितीत शासनाने कुक्कुटपालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लेअर्स क्षेत्रात काम करीत असलेल्या ग्रीन ॲग्रो बाजार एक्स्पोर्टरचे संदीप शेळके यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून त्यांनी शासनाला निवेदन दिले आहे. श्री. शेळके हे गेल्या काही वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात कार्यरत असून त्यांनी अंडी उत्पादनासाठी शेतकऱ्यांची साखळी तयार करण्याचे काम ते करतात. त्यांनी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, ग्रामीण महाराष्ट्रातील शेतीपूरक व स्वयंरोजगाराचे साधन असणारा कुक्कुटपालन व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मका, सोयाबीन, सूर्यफूल, तांदूळ कणी, शेंगपेंड या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये भाववाढ झाल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असतानाच आता काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. नेमक्या या गोष्टींचा काही विघ्नसंतोषी लोकांनी गैरफायदा घेऊन कुक्कुटपालन व्यवसायास बदनाम करून अंडी, चिकन खाण्यामुळे कोरोना विषाणूची लागण होते, अशी अफवा पसरविली. याचा कुक्कुटपालन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून गेल्या पाच आठवड्यात अंडी, चिकन खपावर प्रतिकूल परिणाम झाल्याने हा व्यवसाय आर्थिक नुकसानीत गेला आहे. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.