कमी दरात काजू खरेदीचा काही दलालांचा प्रयत्न

सिंधुदुर्गः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही दलालांकडून सुरू असून शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रूपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. ‘कोरोना’मुळे आणखी दर कमी होईल, अशी भीती दाखवून काजू खरेदी करण्याचा त्यांचा हेतु आहे. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकरी चितेंत आहेत.
Some brokers try to buy cashew nuts at low rates
Some brokers try to buy cashew nuts at low rates

सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न जिल्ह्यात काही दलालांकडून सुरू असून शेतकऱ्यांकडून ५० ते ६० रूपये दराने काजू बी खरेदी केली जात आहे. ‘कोरोना’मुळे आणखी दर कमी होईल, अशी भीती दाखवून काजू खरेदी करण्याचा त्यांचा हेतु आहे. दलालांच्या या भूमिकेमुळे शेतकरी चितेंत आहेत.

जिल्ह्यात उत्पादनक्षम काजूचे क्षेत्र ४९ हजार हेक्टर आहे. काजू हे जिल्ह्यातील एकमेव फळपीक आहे. जे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेतले जाते. त्यामुळे काजूला जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो. काजू व्यवसायातून जिल्ह्यात बाराशे ते पंधराशे कोटीची आर्थिक उलाढाल होते. परंतु यावर्षी लांबलेला पाऊस आणि वातावरणातील सतत बदल काजू उत्पादनाच्या मुळावर आले आहेत. यावर्षी काजूचे उत्पादन जेमतेम २५ टक्केच येईल, अशी अपेक्षा आहे.

मात्र, असे असले तरी जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून काजू उत्पादनाला सुरुवात झाली आहे. अतिशय काटेकोर नियोजन केलेल्या शेतकऱ्यांच्या बागेतून काजूचे चांगले उत्पादन मिळत आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काजुला १३० ते १४० रूपये दर मिळत होता. त्यानतंर हा दर अखेरपर्यंत सुरू होता. काजू बी खरेदीची जिल्ह्यातील प्रकिया विविध स्तरावर होते. 

अधिकांश काजू खरेदीदार आठवडा बाजारांमध्ये जाऊन करतात. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यांपासून देशात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव जाणवू लागला. त्यानतंर तत्काळ जिल्ह्यातील आठवडा बाजारांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे आपसुकच काजू खरेदी थांबली. याचाच फायदा सध्या दलाल घेत आहे. कोरोनामुळे काजु बीचे दर घसरले आहेत. सध्या ५० ते ६० रूपयेच दर आहे, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.

येत्या काही दिवसांत अजूनही काजूचे दर कमी होणार आहेत, असे चित्र शेतकऱ्यांसमोर उभे करून अधिकाधिक काजू कमी दराने खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काही बागायतदार कवडीमोल दराने काजूची विक्री करीत आहेत.

‘कोरोना’चा फायदा उठवित काही दलाल कमी दराने काजू बी खरेदी करीत आहेत. मयताच्या टाळू वरील लोणी लाटण्याचा हा प्रकार आहे. अशा दलालांवर शासनाने कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी कुणाही दलालांवर विश्‍वास ठेवू नये. सुशांत नाईक, काजू उत्पादक शेतकरी

५० ते ६० रूपये काजू बी खरेदी करण्याचे प्रकार जिल्ह्यात काही ठिकाणी सुरू आहेत. परंतु जिल्ह्यातील कुणीही शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने काजू विक्री न करता काजू बी सुकवून तिची व्यवस्थित साठवणूक करून ठेवावी. काजू विक्री करण्यासाठी अजिबात घाई करू नये. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या सोबत आहे. - अतुल काळसेकर, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com