जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर, अतिपावसाचा पाण्याचा मोठा फटका बसला आहे. यातच पूर ओसरत नाही, तोच नदीतून वाळू उपसा सुरू झाला आहे. यामुळे गिरणा नदीमधील वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
गेल्या सहा सात वर्षांपासून गिरणा नदीतून वाळू उपसा सुरूच आहे. यामुळे नदीकाठच्या शिवारात नदी, कूपनलिकांचे पाणी आटण्याचे प्रकार वाढले आहे. कितीही पूर आला, चांगला पाऊस झाला, तरीही नदीकाठच्या विहिरींमधील जलसाठा मार्चमध्येच कमी होतो. नदीत वाळू असली, तर पाणी मुरते. पण, वाळूच कमी झाली आहे. यामुळे नदीतील पाणी वाहून जाते. यामुळे वाळूचा बेकायदेशीर उपसा किंवा प्रशासनाकडून मंजुरी घेऊन सुरू होणारा वाळू उपसा बंद झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
गिरणेच्या वाळूवर मोठे अर्थकारण गावोगावी सुरू आहे. ग्रामपंचायतींची भूमिका लक्षात न घेता वाळू उपसा लिलाव करून प्रशासन सुरू करण्यास मंजुरी देते. गिरणा नदीकाठच्या सुमारे १०० गावांमधून बारमाही वाळू उपसा सुरू असतो. रात्री, पहाटे वाळू उपसा करणारी वाहने फिरतात. सुसाट धावतात. शेतरस्ते, गावांचे मुख्य रस्ते याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.
अत्यंत दर्जेदार वाळू म्हणून गिरणेच्या वाळुचे महाराष्ट्रात नाव आहे. यामुळे मुंबई, नाशिक, नगर, बुलडाणा व इतर भागातही गिरणेची वाळू पाठविली जाते. अनेक मध्यस्थ, खरेदीदार, वाहतुकदार, अशी साखळी तयार झाली आहे.
ही साखळी तोडणे प्रशासनाला अशक्य होत आहे. कारवाई काही दिवस केली जाते. पुन्हा वाळूचा उपसा सुरू होतो. काही गावांमधून २२ ते २३ वर्षांपासून वाळू उपसा सुरू आहे. त्यात जळगाव, धरणगाव तालुक्यातील अनेक गावे या समस्येने त्रस्त आहे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.