सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरा

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पेरणीसाठी वाफसा आलेला नाही. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत पेरणीची गती वाढेल. जत तालुक्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचा ३९ हजार ३६१ हेक्टरवर पेरा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Sow Rabbi on 39,000 hectares in Sangli
Sow Rabbi on 39,000 hectares in Sangli

सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पेरणीसाठी वाफसा आलेला नाही. त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत पेरणीची गती वाढेल. जत तालुक्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचा ३९ हजार ३६१ हेक्टरवर पेरा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्याचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख १७ हजार ६३२ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ज्वारीसाठी १ लाख ४६ हजार ४९२ हेक्टर आहे. हरभरा पिकासाठी २४ हजार ८९९, गव्हासाठी २३ हजार २०८ तर मक्यासाठी १९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील  आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात प्रामुख्याने रब्बी हंगामातील ज्वारी पीक घेतले जाते.

या भागात ज्वारीची आगाप पेरणी केली जाते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या भागात ज्वारीची पेरणी उशिरा सुरु झाली. दुष्काळी पट्ट्यात वाफसा आल्याने शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करू लागला आहे. त्यानुसार ज्वारीची पेरणीचे नियोजन करू लागला आहे. जत तालुक्यात ज्वारीची पेरणी २८ हजार ६५१ हेक्टरवर झाली आहे. तर मक्याची १ हजार ६१९ हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, खानापूर, तासगाव, आणि शिराळा तालुक्यात वाफसा नसल्याने मशागती खोळंबल्या असून मशागतीही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे या तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याला सुरुवात झालेली नाही. येत्या पंधरा ते वीस दिवसात पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे.

वाफसा नसल्याने पेरणी खोळंबली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. आजही बहुतांश शेतात पाणी साचलेले दिसते आहे. मशागती करण्यात अडचणी येत आहे. एकाबाजूला पेरणी सुरू झाली असली तरी, अनेक ठिकाणी मशागती पूर्ण झालेल्या नसल्याचे चित्र आहे.  वाफसा नसल्याने पेरणी खोळंबली असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. आजअखेर ३९ हजार ३६१ हेक्टरवर पेरा झाला असून सर्वाधिक पेरा ज्वारीचा आहे. परतीच्या पावसाने वाफसा आलेला नाही. त्यामुळे वाफसा आल्यानंतर पेरणीची गती वाढेल. - बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com