पेरलेला कांदा काढणीला 

यंदा वातावरणामुळे रोपे सडली. लागवड झालेला कांदाही अर्ध्यावर मृत झाला. त्यात भावही तेजीत, पण रोपे नाही म्हणून थांबतील ते शेतकरी कसे.
onion
onion

येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली. लागवड झालेला कांदाही अर्ध्यावर मृत झाला. त्यात भावही तेजीत, पण रोपे नाही म्हणून थांबतील ते शेतकरी कसे. रोपे नसल्याने पारंपरिक लागवडीच्या पद्धतीवर पर्याय शोधत शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय निवडला. जिल्ह्यात येवला, चांदवड व कसमादे भागांत अंदाजे एक हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कांदा पेरणी झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला तो काढणीयोग्य झाला असून, पुढील १०-१५ दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे.  सततच्या पावसामुळे पोळचे रोप, कांदे तसेच रांगडा व उन्हाळ कांद्याच्या रोपांची वाताहत झाली. रांगडा, लाल व उन्हाळ कांद्याचे रोप नसल्याने, बियाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठी समस्या उभी राहिली. त्यामुळे यंत्राने पेरणीकडे कल वाढला. यंदा खरीप हंगामात झालेला अतिपाऊस, कडक ऊन, बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव यामुळे पोळ, लाल कांद्याची रोपे पूर्णपणे सडली. थोडाफार लागण झालेला पोळ कांदाही वाफऱ्यातच मृत झाल्याने तालुक्यात पोळ कांद्याचे उत्पादन या वर्षी निम्म्याने घटणार आहे. शिल्लक असलेला उन्हाळ कांदाच आता टप्प्याटप्याने मार्केटमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरला दिसेल. नव्या वर्षात जानेवारीमध्ये खऱ्या अर्थाने तालुक्यातील लाल कांदा बाजारात दिसेल असा जाणकारांचा अंदाज आहे. सायगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केलेली असून, काहींचा कांदा काढणीला आला आहे. प्रगतिशील शेतकरी भागुनाथ उशीर यांनी पोळ कांदा उत्पादनावर निर्सगामुळे झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रेंडाळा-ममदापूर येथील शेतात दोन एकर पोळ कांद्याची पेरणी केली होती. तालुक्यातील व परिसरातील पोळ लाल कांद्याची रोपे, कांदा लागवड संपूर्णपणे नष्ट होत असताना पेरलेल्या पोळ कांद्याचे नुकसान त्या प्रमाणात कमी झाले. सर्व बुरशीजन्य रोगांशी सामना करत ७५ टक्के कांदा सुरक्षित राहिला आहे. पेरल्यापासून ६ ते ७ कीटकनाशक फवारण्या केल्या आहेत. पेरलेला कांदाही वेळोवेळी विविध रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत राहिल्याने १०५ दिवसांत म्हणजे साडेतीन महिन्यांत निघणारा कांदा १२० ते १२५ दिवसांत म्हणजे चार, सव्वाचार महिन्यांत काढणीला येणार आहे.

प्रतिक्रिया मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेले बसवंत ७८० जातीचे बियाणे पेरले. यातून ४५ ते ५० क्विंटल एकरी कांदा उत्पादन होईल अशी खात्री आहे. लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत पेरलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च ३० टक्क्यांनी कमी आहे. - भागुनाथ उशीर,  प्रयोगशील शेतकरी, येवला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com