गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले नापास

आमच्या सोयाबीन बियाणांची उगवशक्ती कमी आल्याच्या कारणामुळे ६० क्विंटल नापास करण्यात आले आहे. यामुळे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. परत एकदा बियाणे नमुने काढून उगवशक्ती तपासणी चाचणी घ्यावी. - शेषराव शंकरराव चापके, कात्नेश्वर, ता. पूर्णा, जि. परभणी.
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले नापास
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले नापास

परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात महाबीजअंतर्गत सोयाबीनचे बीजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे २६२ लॅाटचे १० हजार क्विंटल बियाणे उगवणशक्ती चाचणीत नापास झाले आहे. तापमानवाढीमुळे उगवण शक्ती कमी झाली असल्याचे कारण महाबीजकडून सांगितले जात आहे. परंतु यामुळे सोयाबीन बीजोत्पादकांना मोठा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नव्याने बियाणाचे नमुने (रिसॅम्पलिग) काढून उगवणशक्ती चाचणी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

गतवर्षी (२०१८) काढणी हंगामात पाऊस नसल्यामुळे बियाणे खराब झाले नाही. त्यामुळे महाबीजतर्फे राबविण्यात आलेल्या सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमातून १ लाख ६० हजारांवर क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. महाबीजच्या येथील बीजप्रक्रिया केंद्राची ९० हजार क्विंटलपर्यंत बियाणे ग्रेडिगची क्षमता आहे. बियाणे उत्पादन वाढल्याने ग्रेडिंगसाठी सिंगणापूर, हिंगोली जिल्ह्यातील चार ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांचे बियाणे पाठविण्यात आले.

ग्रेडिंगनंतर उगवणशक्ती तपासणीसाठी बियाणे नमुने काढून कृषी विभागाच्या परभणी येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले. उगवशक्ती तपासण्याची प्रक्रिया दरवर्षी एप्रिलमध्ये संपत असते. परंतु, बियाणे उत्पादन वाढल्यामुळे उगवणशक्ती तपासणी चाचण्या अद्याप सुरू आहेत. 

परभणी येथील बीजप्रक्रिया केंद्रातील १७३ लॅाटचे ६ हजार ५९६ क्विंटल आणि सिंगणापूर येथील केंद्रातील ८९ लॅाटचे ३ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनच्या बियाणे उगवणशक्ती कमी आल्यामुळे नापास झाले आहे. सलग ६० लॅाटचे बियाणे नापास झाल्याच्या कारणांचा शोध घेणेदेखील आवश्यक आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील केंद्रावरील नापास बियाणांची आकडेवारी उपलब्ध झाल्यास नापासाचे प्रमाण वाढणार आहे. वाढत्या तापमानाचा उगवणशक्तीवर झाला असल्याचे कारण महाबीजकडून सांगतिले जाते. बियाणे नापास झालेल्या शेतकऱ्यांना महाबीजने दिलेली प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये एवढी अग्रीम रक्कम परत करावी लागणार आहे. नापास बियाणांची खुल्या बाजारात विक्री करावी लागणार आहे. बाजारभाव कमी झाले आहेत. शिवाय लो ग्रेडचे बियाणे दिले जाते. त्यामुळे दर कमी मिळतात. नापास बियाणांमुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बियाणांचे नव्याने नमुने काढून उगवणशक्ती तपासावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी महाबीजकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com