नागपूर विभागात धानासह सोयाबीन, कपाशी हातची गेली

विभागातील सहा जिल्ह्यांत १९ लाख हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड आहे. यामध्ये धानाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. प्राथमिक माहितीनुसार, विभागात अधिक नुकसान नसल्याचे कळते. तरीसुद्धा प्राथमिक सर्व्हेक्षण आणि पंचनाम्याची कारवाई केली जात असून, त्यानंतरच खुलासा होईल. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग जिल्ह्यात काही भागात पाहणी केली. त्यावरून नुकसान अधिक असून, त्याची तीव्रता देखील जास्त असल्याचे लक्षात आले. प्रशासनाला याची दखल घेत सर्व्हेक्षण आणि पंचनामा करण्याचे सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून हे काम झाल्यानंतर मदतीसाठी देखील पाठपुरावा केला जाईल. - नाना पटोले, आमदार, साकोली भंडारा
नागपूर विभागात धानासह सोयाबीन, कपाशी हातची गेली
नागपूर विभागात धानासह सोयाबीन, कपाशी हातची गेली

नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सुमारे १९ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड झाली. यापैकी सुमारे ७  लाख ३५ हजार हेक्‍टरवर केवळ धान आहे.  त्यातील काढणीस आलेल्या हलक्‍या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागांत सोयाबीन, कपाशीचे देखील पावसामुळे नुकसान झाले. 

भंडारा जिल्ह्यात सुमारे २ लाख ७ हजार हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. त्यातील १ लाख ७७ हजार हेक्‍टरवर धान असले, तरी हलक्‍या प्रतीच्या धानाचा अपवाद वगळता इतर पिकांना फटका बसला नाही, असा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. 

हलक्‍या प्रतीच्या धानाची लागवड जिल्हयात कमी असल्याचेही कृषी विभागाने सांगीतले. नुकसानग्रस्त भागात प्राथमिक सर्व्हेक्षणाला सुरवात करण्यात आली. त्यासोबतच पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांकडून विमा परताव्यासाठी फॉर्म भरून घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात या वर्षी १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याची माहिती भंडारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी दिली. 

चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार हेक्‍टर क्षेत्र असून, ४८ हजार हेक्‍टर सोयाबीन, १ लाख ७७ हजार हेक्‍टर धान असे लागवड क्षेत्र आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार नव्हती. पाऊस बरसल्यानंतर उघडीप मिळाल्याने पिकांचे फारसे नुकसान झाले नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात या वर्षी शेतकऱ्यांमध्ये पीकविमाविषयक प्रसार, प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यामुळेच गेल्या वर्षी जिल्ह्यात ५० हजार १५ शेतकरीच पीकविमाधारक असताना या वर्षी ८९ हजारांपेक्षा अधिक  शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी दिली. 

गोंदिया जिल्ह्यात २ लाख ६ हजार हेक्‍टर खरीप क्षेत्र आहे. राइस सिटी ओळख असलेल्या या जिल्ह्यात खरिपातील एकूण क्षेत्राच्या १ लाख ९८ हजार हेक्‍टरवर या वर्षी धान लागवड आहे. सुरवातीला पाऊस नसल्याने या वेळी धानाच्या रोवण्या लांबल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या धानाच्या जातींवर भर दिला. पावसामुळे कापून ठेवलेल्या धानाला कोंब फुटल्याचे प्रकार काही भागात घडले असले तरी हे प्रमाण अत्यल्प असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नैनवाड यांनी दिली. 

वर्धा जिल्ह्यात सुमारे ४ लाख ३५ हजार हेक्‍टरवर खरीप लागवड होते. एक लाख सात हजार हेक्‍टर सोयाबीन, तर उर्वरित २ लाख १० हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होते. सोयाबीनला या वेळी पावसाचा फटका बसला असला, तरी प्राथमिक सर्व्हेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा सांगता येत नसल्याची माहिती वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे ३५ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्‍टर खरीप लागवड होते. सिंरोचा, अहेरी, चामोर्शी या भागांत होतो. उर्वरित क्षेत्रावर धान आहे. नागपूर जिल्ह्यात ४ लाख ७३ हजार हेक्‍टरवर खरीप लागवड आहे. सर्व्हेक्षण आणि पंचनाम्याअंती  नुकसानीबाबत खुलासा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com