भंडारा जिल्ह्यात अतिपावसाचा सोयाबीनला फटका

अतिपावसामुळे सोयाबीनचे नुकसान
अतिपावसामुळे सोयाबीनचे नुकसान

भंडारा  ः पावसाची संततधार कायम असल्याने भंडारा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये परिपक्‍व अवस्थेतील सोयाबीनला कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी त्यांनी केली आहे. राजेदहेगाव, परसोडी, कोंडी परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. 

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे. परंतु या जिल्ह्यातील काही गावांमध्ये कपाशी, सोयाबीनची देखील लागवड होते. भंडारा तालुक्‍यात काही शेतकऱ्यांनी खरिपात सोयाबीनला पसंती दिली आहे. परंतु यंदा संततधार पावसाने परिपक्‍व होण्याच्या अवस्थेतील सोयाबीनला आता कोंब फुटले आहेत. गेली काही वर्षे दुष्काळी स्थितीमुळे या भागातील शेतकरी त्रस्त होते. या वर्षी परिस्थिती दिलासादायक असेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु त्यांच्या या अपेक्षेवर पावसाने पाणी फिरल्याची स्थिती आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व्हेक्षण व पंचनाम्याची मागणीदेखील दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप आहे. 

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आपल्या स्तरावर सर्व्हेक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक नुकसानीचे सर्व्हेक्षण केले जाईल, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com