नगर जिल्ह्यात यंदाही सोयाबीन पीक संकटात

यंदा पहिल्यापासूनच सोयाबीन पीक संकटात सापडले. काही दिवसात काढणीला येऊ पाहत असलेले पीक सततच्या पावसामुळे अडचणीत येत आहे. पाने पिवळी पडू लागली असून शेंगाही सडू लागल्या आहेत. सद्यःस्थितीचा विचार करता जिल्ह्यात पेरणी झालेल्यांपैकी पन्नास टक्के म्हणजे तीस ते चाळीस हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
Soybean crop in crisis in Nagar district this year too
Soybean crop in crisis in Nagar district this year too

नगर ः सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने लवकर पेरणी झाली. परंतु निकृष्ट बियाणे पुरवठ्यामुळे यंदा पहिल्यापासूनच सोयाबीन पीक संकटात सापडले. काही दिवसात काढणीला येऊ पाहत असलेले पीक सततच्या पावसामुळे अडचणीत येत आहे. पाने पिवळी पडू लागली असून शेंगाही सडू लागल्या आहेत. सद्यःस्थितीचा विचार करता जिल्ह्यात पेरणी झालेल्यांपैकी पन्नास टक्के म्हणजे तीस ते चाळीस हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. पुणे

गतवर्षाप्रमाणे यंदाही सोयाबीनचे नुकसान होते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे असते. गेल्यावर्षी ८८ हजार ९०५ हेक्टरवर तर यंदा ८८ हजार ०९४ हेक्टरवर सोयाबीनचे पेरणी झालेली आहे. यंदा चांगल्या पावसामुळे लवकर पेरणी झाली. मात्र, निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

सुरुवातीपासून सोयाबीन पीक अडचणीत असतानाही गतवर्षीच्या एवढी पेरणी झाली. मात्र, आता एेन काढणीला येण्याच्या काळातच सोयाबीनला अडचणी निर्माण झाल्या आहेत. सतत पडत असलेल्या पावसाने शेंगा सडू लागल्या आहेत.  शिवाय पिकांत पाणी साठवून राहू लागल्याने पाने पिवळी पडू लागली आहेत. अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर सोयाबीनचे उत्पादनावर यंदाही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गतवर्षीही बसला होता मोठा फटका गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात ८८ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, एेन काढणीच्या काळात परतीचा जोरदार पाऊस सुरू झाला आणि सलग वीस ते पंचवीस दिवस पाऊस सुरू राहिल्याने गतवर्षी साठ ते सत्तर हजार हेक्टरवरील पिकाची माती झाली होती. गेल्यावर्षी सोयाबीन उत्पादकांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला होता. गतवर्षी बियाणे उत्पादनावर झाला आणि यंदा पेरलेल्या बियाणांतून त्याचा परिणाम दिसून आले आहेत.

नगर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून उत्पादनात घट येणार हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अजून फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. - डाॅ. कृषीराज टकले, युवक नेते, रयत क्रांती शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com