`टेंभूसह दुष्काळी भागातील पाणी योजनांची कामे गतीने करा`

`टेंभूसह दुष्काळी भागातील पाणी योजनांची कामे गतीने करा`
`टेंभूसह दुष्काळी भागातील पाणी योजनांची कामे गतीने करा`

आटपाडी जि. सांगली :  टेंभूसह दुष्काळी भागातील पाणी योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याची मागणी बुधवारी (ता. २६) येथे झालेल्या सत्ताविसाव्या पाणी परिषदेत करण्यात आली. त्यासाठी वेळप्रसंगी लढा तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. 

भवानी विद्यालयावर शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेतर्फे २७ वी पाणी परिषद आयोजित करण्यात आली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून परिषदेची सुरवात झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख, तर निमंत्रक म्हणून हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी उपस्थित होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, बाळासाहेब नायकवडी, दादासाहेब ढेरे आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले ,‘‘चळवळीच्या लढ्यामुळेच टेंभूचे पाणी सांगोला, आटपाडी तालुक्यांत आले. चळवळ उभा राहिली नसती, तर टँकर भरण्यासाठी जागाही मिळाली नसती. चळवळीच्या रेट्यामुळेच योजनेला निधी मंजूर झाला. योजना अपूर्ण आहे. डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत योजना पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले. कोणत्याही परिस्थितीत मुदतीत योजना पूर्ण केली पाहिजे. सर्व पंप सुरू करावे. परिषदेतील सर्व ठराव आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले जातील. दुष्काळी भागातील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र करून मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊ.’’    

राजेंद्र देशमुख म्हणाले, ‘‘टेंभूच्या पाण्याने नुसते तोंड दाखवले आहे. अजून खऱ्या अर्थाने पाणी आले नाही. पाण्याची आवर्तने निश्चित करावी. काही गावांनी पैसे भरूनही त्या गावांना पाणी दिले नाही. एक दिवस अगोदर पैसे भरले. गावाच्या बाहेर पाणी आले. तोच ते बंद केले. अधिकारी पाण्याच्या मापात पाप करीत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे.’’       

संजय गांधी निराधार योजनेत वाढ  

गेल्याच आठवड्यात गेल्याच आठवड्यात संजय गांधी निराधार योजनेचे मासिक सहाशे रुपये पेन्शन वरून हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितली.

सभेतील ठराव

समन्यायी पद्धतीने पाणीवाटप कायद्याची अंमलबजावणी करावी. बंदिस्त पाइपलाइन कामांना गती द्या. वगळलेल्या बारा गावांचाही योजनेत समावेश करा. पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याने दुष्काळी भागातील तलाव आणि बंधारे भरून द्या. टेंभू योजनेचे पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी असे नामकरण करावे. राज्यातील २६ अपूर्ण प्रकल्प नियोजनानुसार पूर्ण करावे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com