सरकारच्या दाव्यांचा विरोधकांकडून पंचनामा

सरकारच्या दाव्यांचा विरोधकांकडून पंचनामा
सरकारच्या दाव्यांचा विरोधकांकडून पंचनामा

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. १३) अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये अर्थमंत्र्यांच्या अनेक कवितांचा कवितांमधूनच समाचार घेतला. यंदाच्या अर्थसंकल्पाला हजारो शेतकरी आत्महत्या, वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या, हजारो कुपोषित बालकांचे मृत्यू, कमला मिल अग्नितांडवातील १४ निरपराधांचे बळी अशी पार्श्वभूमी होती. तरीही अर्थमंत्र्यांना कविता सुचत होत्या, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.  यंदाचा अर्थसंकल्प कवी संमेलन भासत होते. अर्थमंत्री एक चांगले कलाकार आहेत. त्यांच्या कविता वाचनासाठी एखादे विशेष अधिवेशन बोलावायला हरकत नाही, अशा मार्मिक शब्दांत विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांना चिमटे काढले. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कवी कालिदासांचा उल्लेख केला. पण, त्यांचा आवेश असा होता, की कवी कालिदासानंतर जणू आपले सुधीरदासच; आणि कालिदासांच्या मेघदूतानंतर सुधीरदासांचा अर्थसंकल्पच, अशी परिस्थिती असल्याचे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले. सरकारने तीन वर्षे केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला; पण आता जनतेला वस्तुस्थिती उमगल्याने सरकारला आपली बाजू सावरण्यासाठी कविता, शेरोशायरीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक कविता सांगत सरकारच्या नियोजनशून्य लोकविरोधी कारभाराचे वाभाडे काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com