चंद्रपूर ः राज्यात कापूस उत्पादकांची दराअभावी लूट होत आहे. शासकीय खरेदीतही गोंधळ असल्याने संपूर्ण कापूस खरेदीला अनेक महिने लागतील, या साऱ्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे.
सीसीआयने कापूस खरेदीसाठी वारंवार पत्र दिले. सीसीआयकडूनच कापूस खरेदीची पूर्वतयारी करण्यात आली. ग्रेडरही उपलब्ध केले गेले. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून आवश्यक बाबींची उपलब्धता करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले. एका केंद्रावर ठरावीक वाहन संख्येतच कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील कापूस घेण्यालाच अनेक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या उदासीनतेमुळे पैशाची गरज असलेले शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल विकून मोकळे होत आहेत. व्यापारी या संधीचा फायदा उचलत हमीभावापेक्षा एक हजार ते १५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. सीसीआयच्या कापूस केंद्रावर आजवर चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सद्यःस्थितीत एका दिवशी दहा ते पंधरा गाड्यांमधील कापूस खरेदी केला जात आहे. परिणामी कापूस खरेदीची गती वाढवावी, त्याकरिता नवे केंद्र सुरू करावे, अशी मागणी श्री. अहिर यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.