पालकमंत्री बच्चू कडू राबविणार ‘चला चूल पेटवू’ सेवाअभियान

अकोला: जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘चला चूल पेटवू’ या सेवा अभियानाची सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. ११) महात्मा फुले जयंती, मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे उत्सवी स्वरूप टाळून हे अभियान केवळ सेवा कार्यातून राबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकमंत्री बच्चू कडू राबविणार ‘चला चूल पेटवू’ सेवाअभियान
पालकमंत्री बच्चू कडू राबविणार ‘चला चूल पेटवू’ सेवाअभियान

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘चला चूल पेटवू’ या सेवा अभियानाची सुरुवात केली आहे. शनिवारी (ता. ११) महात्मा फुले जयंती,  मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे उत्सवी स्वरूप टाळून हे अभियान केवळ सेवा कार्यातून राबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची सेवा करावी असे कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यासाठी समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी घरी राहून आपल्या जवळपासच्या गरीब कुटुंबांना गरजूंना शिजवलेले अन्न किंवा ते शक्य नसेल तर अन्न धान्य द्यावे. किमान २०० ते ५०० रुपये देऊन आर्थिक मदत करावी. ही सेवा केवळ स्वतः च्या खर्चातून करावयाची आहे. त्यासाठी कोणीही एकत्र येण्याची गरज नाही. कोणाकडून वर्गणी गोळा करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. केलेल्या सेवेची माहिती ७३५००८७२२७ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन त्यांनी म्हटले आहे. जे कार्यकर्ते उत्कृष्ट सेवा करतील त्यांना सर्वोत्तम कोरोनामुक्त कार्यकर्ता म्हणून घोषित केले जाईल, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com