बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह दुचाकीने धडकणार दिल्लीत

तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात तीन दिवसात तोडगा न काढल्यास दुचाकीने दिल्ली गाठत तीन हजार शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह दुचाकीने धडकणार दिल्लीत
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह दुचाकीने धडकणार दिल्लीत

अमरावती : तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात तीन दिवसात तोडगा न काढल्यास दुचाकीने दिल्ली गाठत तीन हजार शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत असते, आता दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते जाणार आहेत.   राज्यमंत्री कडू म्हणाले,‘‘केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप होत आहे. हे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना बाजार समित्यांबाहेर देखील हमीभावाने खरेदीची शाश्वती मिळावी. त्याकरिता केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी पंजाब मध्ये गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकारने याची दखल न घेतल्याने आंदोलक शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. त्यांना दिल्ली सीमेवर रोखण्यात आले आहे. आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यासोबतच अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चेला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळेच गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावाची स्थिती आहे.’’  ‘‘आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर केंद्र सरकार देखील आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे कोणताही तोडगा निघण्याची यापुढे देखील शक्यता नाही. मात्र शेतकऱ्यांना असे वेठीस धरणे योग्य नाही,’’ असे सांगत बच्चू कडू यांनी या आंदोलनात उतरण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, तीन दिवसात हा विषय मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्रातील तीन हजार शेतकऱ्यांसह दुचाकीने आपण दिल्लीकडे कूच करू असा इशाराही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.  प्रतिक्रिया.. देशाच्या कोणत्याही भागातील शेतकरी, नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. लोकशाही तत्त्व यालाच म्हटले जाते. परंतु केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर असलेल्या लाखो शेतकऱ्यांबाबत अन्याय पूर्ण धोरण राबवत आहे. केंद्र सरकारने न्यायिक भूमिका बजावत तीन दिवसात या प्रश्नी तोडगा काढावा व शेतकऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करावे अन्यथा महाराष्ट्रातून आम्ही तीन हजार शेतकरी घेऊन दिल्लीकडे कूच करू. - बच्चू कडू, राज्यमंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com