नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग आला आहे. मात्र, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. अनेक प्रश्न असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असूनही सरकार व प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ७) या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.
सोयाबीन बियाणे उगवण अडचणी, मका व कापूस खरेदी, कांद्याचे पडलेले दर व सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळत नसलेला पीक कर्ज असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या अनुषंगाने रयत क्रांती संघटनेने सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे, येवला तालुकाध्यक्ष शंकरराव गोरे, प्रशांत सानप, नवनाथ उगले, सुभाष सांगळे आदींनी प्रातिनिधिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर केले.
प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.