सातारा जिल्ह्यात १४४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र होऊ लागल्याने टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १३४ गावे ६१७ वाड्यावस्त्यांवर १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  

जिल्ह्यात माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई, पाटण या तालुक्यांतील १३४ गावे ६१७ वाड्यावस्त्यांवरील दोन लाख २६ हजार ४११ लोकसंख्येस १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. माण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ८५ टॅंकरद्वारे ६४ गावे आणि ४९८ वाड्यावस्त्यांवरील एक लाख २० हजार ५४२ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यात २२ टँकरद्वारे २९ गावे व ८६ वाड्यावस्त्यांवरील ४५ हजार १६८ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात २१ टँकरद्वारे २३ गावांतील ४० हजार ९६६ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावातील ४१५ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

फलटण तालुक्यात नऊ टँकरद्वारे ११ गावे व ३१ वाड्यावस्त्यांवरील १३ हजार ६४४ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जाताे. वाई तालुक्यात पाच टँकरद्वारे पाच गावे व दोन वाड्यावस्त्यांवरील ४९१० लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात टंचाई जाणवू लागली आहे. या तालुक्यातील एका गावातील ७६६ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. 

संरक्षित पाणीसाठ्यासाठी प्रशासनाकडून पाच तालुक्यांतील ७४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये माण २३, खटाव ३२, कोरेगाव चार, वाई नऊ व फलटण तालुक्यातील चार विहिरींचा समावेश आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टँकरची मागणी वाढत आहे. पाणीटंचाईच्या झळा जनावरांना बसत आहे. सध्या जिल्ह्यातील ७९ हजार ५६४ जनावरे पाणीटंचाईने बाधित आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com