दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा ः तुपकर

दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा ः तुपकर
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा ः तुपकर

बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप हातातून गेला तर रब्बीला निसर्गाने फटका दिल्याने उत्पन्नाची अपेक्षा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. परंतु बॅंका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसुली सुरू केली अाहे. ही वसुली तातडीने बंद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. 

याबाबत त्यांनी बुधवारी (ता. १२) अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. बोंड अळीने कापूस उद्‌ध्वस्त झाला. पाणी नसल्याने खरीप व रब्बी हे  दोन्ही हंगाम हातातून गेले. 

शासनाने दुष्काळ घोषित केला असून कर्जवसुलीस स्थगिती दिलेली आहे. परंतु असे असतानाही बॅंका, मायक्रो फायनान्सच्या वसुली पथकाच्या गाड्या व कर्मचारी गावोगावी फिरून शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. दुष्काळ असल्याने पतसंस्थांनीही वुसलीबाबत सबुरीचे धोरण घ्यावे, अशी मागणी  तुपकर यांनी केली आहे. अन्यथा वसुली अधिकारी गावात आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना बदडून काढतील, त्यांची कार्यालये उद्ध्वस्त करतील, असा इशाराही दिला.

या मुद्द्याला अनुसरून बँका, मायक्रो फायनान्‍सची बैठक जिल्हाधिकारी घेणार आहेत, असे सांगण्यात अाले. याबाबत स्वतः जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी अाश्वासन दिल्याचे तुपकरांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com