परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे गुरुवारी (ता. १४) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे सार्वत्रिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाईच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील पेडगाव, पाथरी, झिरोफाटा, झरी आदी ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये राजन क्षीरसागर, माणिक कदम, लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, माधुरी क्षीरसागर आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.