सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

सांगली : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसाने उघडीप दिली असली तरी द्राक्षावरील डाऊनी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. रोगावर नियंत्रण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागांवर औषध फवारण्यासाठी पुढे आले आहेत. 

गेली चार दिवस पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज तसेच कवठेमहांकाळ तालुक्‍यातील बहुतांशी गावांत जोराचा पाऊस झाला. तासगाव तालुक्‍यातील डोंगरसोनीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावाच्या बांधाला भेगा पडल्याने तलावास मोठा धोका निर्माण झाला आहे. गावापासून दोन कि.मी. अंतरावर कदम खोरा येथे हा तलाव आहे. या परिसरात गेल चार-पाच दिवस पाऊस पडत आहे. मोरे वस्तीतून डोंगराळ भागातून पाणी या तलावात येते. त्यामुळे तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. तलावामधून सांडव्याद्वारे पाणी बाहेर पडले आहे. या तलावाच्या बांधाला भेगा पडाल्या आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. 

पावसाने उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, शेतात अजूनही पाणी आहे. काढणी थांबली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष पट्ट्यात सातत्याने ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पण, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी फवारणी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. द्राक्ष बागेत फवारणी करून रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या आठवड्यापासून दिवसभर कडक ऊन व रात्रभर पाऊस असे वातावरण राहिले. यामुळे मळणीसहित सर्वच शेतीकामे रेंगाळली. शेतात वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेही मुश्‍कील झाले. असे हवामान अनुभवत असतानाच शुक्रवारी सकाळपासून पावसाळ्यासारखे चित्र बनले. 

सकाळपासून कुंद हवामान, थंड वारे आणि भूरभूर करणाऱ्या पावसाने पिकांपुढे संकटाची चाहूल दिली. एकदम उकाड्यातून एकदम गारवा निर्माण झाल्याने आता उभ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला. सकाळपासून अखंड भुरभुर सुरू असल्याने शेतात जाणे अशक्‍य झाले. आता हे हवामान कधी बदलेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

संततधार पावसामुळे शेतात जाणेही कठीण झाल्याने या वातावरणात खरीप मळण्याही करू शकत नसल्याची स्थिती आहे. यामुळे ऐन लगबगीच्या हंगामात घरी थांबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोल्हापुरातील शेतकऱ्यांना फटका

कोल्हापूर जिल्हात शुक्रवारी (ता. २५) सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. आता हवामान बदलाचा नवा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून विचित्र हवामानाचा सामना शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com