पीकविमाप्रश्नी वडीगोद्रीत रास्ता रोको

विमा कंपनीने ज्या पिकांचा विमा भरणा जास्त आहे तो वगळला व अल्प पेरा असलेल्या पिकांचा विमा मंजूर केला आहे. त्यामुळे विमा कंपनी मालामाल तर शेतकरी कंगाल अशी स्थिती निर्माण झाली आहे. - सुरेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना.
पीकविमाप्रश्नी वडीगोद्रीत रास्ता रोको
पीकविमाप्रश्नी वडीगोद्रीत रास्ता रोको

वडीगोद्री, जि. जालना : जालना जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील खरीप पीकविमा विमा कंपनीकडून नामंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे सोमवारी (ता. ३) सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जालना जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. खरीप हंगाम २०१८- १९  मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीकडे लाखो शेतकऱ्यांनी विमा भरला केला. परंतु जिल्ह्यातील ४८ महसूल मंडळांपैकी ३३ मंडळातील विमा दावा नाकारण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

ज्या १५ महसूल मंडळांना कापसाचा विमा मिळाला तो ही तुटपूंजा असून हेक्‍टरी १२०० ते १३०० रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. सोयाबीन या पिकाचा ४८ महसूल मंडळांपैकी फक्त चार महसूल मंडळात विमा मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ४४ मंडळांचा विमा नाकारण्यात आला. तसेच तुरीचा विमा ही अनेक मंडळात नामंजूर करण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात अल्प प्रमाणात पेरणी होत असलेल्या बाजरी आणि मूग या पिकांचा विमा बहुतेक सर्व मंडळात मंजूर करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले जात असल्याचे ‘स्वाभीमानी’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com