उंबरी येथे रानगव्यांकडून स्ट्रॉबेरीचे नुकसान

उंबरी येथे रानगव्यांकडून स्ट्रॉबेरीचे नुकसान
उंबरी येथे रानगव्यांकडून स्ट्रॉबेरीचे नुकसान

भिलार, जि. सातारा : उंबरी (ता. महाबळेश्वर) येथील शेतकरी गव्यांच्या उपद्रव्यामुळे त्रस्त झाले आहेत. स्ट्रॅाबेरीसह गव्हाच्या पिकाचे गव्यांकडून मोठे नुकसान केले जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

उंबरी येथील नामदेव शंकर पार्टे, राजाराम हरिबा उंबरकर, संदीप किसन उंबरकर, संपत आबाजी उंबरकर, सावळा हरिबा उंबरकर, महेश आनंदा उंबरकर यांचे हातातोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरीचे आणि गहू पिकाचे रानगव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे, तर इतर साहित्याचीही मोडतोड केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी मूग गिळून गप्प राहत नुकसान सोसत आहेत. 

दिवसाढवळ्या गव्यांचे कळप उंबरीच्या रानात दृष्टीस पडत आहेत, त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व महिलांनी या वन्यप्राण्यांची धास्ती घेतली आहे. वन विभागाने या प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे उरलेसुरले पीक तरी हाती येण्यासाठी मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com