स्ट्रॉबेरी रोपांचे सततच्या पावसामुळे नुकसान 

सततच्या पावसामुळे स्ट्राॅबेरी पिकाचे नुकसान
सततच्या पावसामुळे स्ट्राॅबेरी पिकाचे नुकसान

केळघर, जि. सातारा  ः जावळी तालुक्यातील मेढा, केळघर परिसरात खरीप हंगामाबरोबरच स्ट्रॉबेरी पिकाची लागवड शेतकरी करतात. परंतु, या वर्षी जून महिन्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे या रोपांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जावळी तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. त्याबरोबरच स्ट्रॅाबेरी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढले आहे. केळघर, मेढा, करहर, कुडाळ, आनेवाडी या परिसरात परदेशातून मातृवृक्ष मागवून त्याची रोपे तयार केली जातात. या रोपांची मे, जून महिन्यात लागवड केली जाते.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या रोपांची मागणी पाचगणी, भिलार, महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांकडून होत असते. मात्र सतत पडणाऱ्या पावसाने  स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वेण्णा व्हॅली अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ६५ हजार स्ट्रॅाबेरीचे मातृवृक्ष शेतकऱ्यांना देण्यात आले होते. हजारो रुपये खर्च करून येथील शेतकऱ्यांनी २० ते २५ लाख रोपे तयार केली होती. परंतु सततच्या पावसाने या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार केलेली रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फटका बसणार आहे. त्याबरोबरच स्ट्रॅाबेरीच्या लागवडीच्या क्षेत्रातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com