अकोला बाजार समितीत व्यापारी-अडत्यांचा बंद कायम

अडते-व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या बंदबाबत अाम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. बाजार तातडीने सुरू करण्याचे प्रयत्न अाहेत. ई-नाम प्रणालीनुसार कामकाज झाले तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल. त्यादृष्टीने बाजार समिती प्रयत्न करीत अाहे. - सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.
व्यवहार बंद असल्याने बाजार समितीत असा शुकशुकाट होता.
व्यवहार बंद असल्याने बाजार समितीत असा शुकशुकाट होता.

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीनुसार व्यवहाराची अंमलबजावणी केली जात अाहे; परंतु ई-नामप्रणालीमध्ये एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असा ठपका ठेवत बाजार समिती सचिवांनी एका अडत व्यावसायिकाला नोटीस बजावल्याने व्यापारी-अडत्यांनी असहकार सुरू केला अाहे. यामुळे बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासून खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झालेले अाहेत. बुधवारी (ता. २५) मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी सार्वत्रिक बंदमुळे बाजार समिती बंद होती. गुरुवारी (ता. २६) व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा असताना मात्र खरेदी-विक्री झाली नाही. नॅशनल अॅग्रिकलचर मार्केट अर्थात ई-नाम प्रणालीमध्ये एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने बाजार समिती सचिवांनी एका अडत्याला नोटीस बजावली. परिणामी अडते-व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला अाहे. बुधवारी सकल मराठा समाजाने बंद पुकारल्याने बाजार बंदच होता. मात्र अाता गुरुवारी (ता. २६)सुद्धा व्यवहार होतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देश पातळीवरील एक बाजार, या संकल्पनेवर अाधारित राष्ट्रीय कृषी बाजार (नॅशनल अॅग्रिकलचर मार्केट- नाम) प्रणाली सुरू करण्यात अाली अाहे. देशातील मुख्य कृषी बाजारांना संगणकीय प्रणालीद्वारे जाेडण्यात येत अाहे. या याेजनेची राज्याभरात टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी सुरू अाहे. त्यानुसार अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात याेजनेस प्रारंभ करण्यात आला. या प्रमाणीनुसार काम न झाल्याचे दिसताच मागील अाठवड्यात बाजार समितीने एका अडत्यास नाेटीस बजावली. त्यानंतर २१ जुलैला कारवाई करीत अडत्याचा परवाना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा अादेश बजावला. परवाना नियम व सूचनांचे उल्लंघन करून व्यापार करीत असल्याचा ठपका या अादेशात ठेवण्यात अाला होता. दुसरीकडे ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत अडते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. ई-नाम प्रणालीबाबत बाजार समिती प्रशासानाकडे शासन अादेशाची प्रत मागितली हाेती. त्यानुसार अडते-व्यापाऱ्यांना कृषी पणन मंडळाच्या पत्राची प्रत देण्यात अाली. यात अडत्यांनी खरेदीदाराचे भाव घेऊन पाेर्टलवर टाकावे, असे नमूद नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई याेग्य नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांनी करीत खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकलेला आहे. यामध्ये तोडगा काढण्यासाठी बाजार समितीकडून पुढाकार घेतला जात असून, अद्याप त्यात यश अालेले नाही. परिणामी चार दिवसांपासून व्यवहार बंद झालेले अाहेत. धान्याची नासाडी गेल्या काही दिवसांत अकोल्यात सातत्याने पाऊस होत अाहे. बाजार समितीत असलेल्या काही धान्याला पावसाचे पाणी लागल्याने धान्याचे नुकसान होत अाहे. काही पोत्यांमधून थेट अंकूर बाहेर पडल्याचे दिसून अाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com