नाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बुधवार (ता.५) पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
दमदार पावसाने अनेक ठिकाणी नाले व ओढ्यांना पाणी भरून वाहिले. जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यासह पेठ, कळवण, चांदवड, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तालुक्यातही अनेक भागात झाला. त्यामुळे पिकांना मोठा आधार झाला आहे.
प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका व कापूस ही पिके मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर पिके अडचणीत आली होती. प्रामुख्याने जिल्ह्यात निफाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात इगतपुरी, पेठ सुरगाणा, त्र्यंबकेश्वर पावसाने हजेरी लावली. मात्र, पाऊस वेळेवर न झाल्याने या भागात अजूनही पिकांचे नियोजन कोलमडले आहे. तर, काही भाजीपाला लागवडी या पावसामुळे बाधित झाल्या आहेत.
पावसाने खंड दिल्यानंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात लागवडी खोळंबल्या होत्या. त्यामुळे या पावसाने पुन्हा एक संजीवनी दिली आहे. मात्र, असे असले तरी चालू वर्षी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.