सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील दीपक कासोटे हा तरुण शेतकरी कोकणातील वीस एकर शेती करारावर कसतो आहे. शाश्वत उत्पन्न म्हणून १४ एकरांत ऊस तर बाजारपेठेची गरज ओळखून तेवढेच पिकवताना ताज्या उत्पन्नासाठी आठ एकरांत टप्प्याटप्प्याने भाजीपाला व कलिंगड असे नियोजन करून उत्पादन व उत्पन्नाचा सुरेख मेळ साधत आर्थिक घडी स्थिरसावर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडमठ (ता. वैभववाडी) हे कोकण रेल्वेमार्गावरील छोटेसे गाव आहे. कुर्ली-घोणसरी धरण प्रकल्पानंतर गावातील शेतीचे स्वरूप बदलले. तत्पूर्वी भात, नाचणी अशी पिके घेतली जायची. होती. गावात दीपक कासोटे आणि कुटुंबीयांनी टप्प्याटप्याने २० एकर जमीन करारावर घेतली. कासोटे यांचे मूळ गाव कोल्हापूर (कसबा बावडा) असून तेथे त्यांची थोडीफार जमीन आहे. परंतु मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी करार शेतीचा मार्ग निवडला.
प्रयत्नशीलवृत्तीचा युवा शेतकरी
आर्थिक संकट कोसळले एक वर्षानंतर आणखी सात एकर जमीन घेतली. त्यातही केळी लागवड केली. दोन्ही बागांमध्ये नियोजनबद्ध काम सुरू होते. स्थानिक हवामान, जमिनीचा पोत आदी बाबींचा बऱ्यापैकी अंदाज येत होता. शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केला. आठ एकरांतील बाग ऑक्टोबर तोडणीला आली. व्यापारी केळी नेण्यासाठी येणार होता त्याच दिवशी सकाळी बागेला चक्रीवादळाचा तडाखा बसला. संपूर्ण बाग क्षणार्धात जमीनदोस्त झाली. सव्वा दोनशे टन मालापैकी फक्त आठ ते दहाच टन माल हाती लागल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले.
संकटावर संकट दुसरे संकट वाट पाहत होते. अन्य सात एकर बागेतील केळीना चांगले घड आले. झालेले नुकसान भरून काढता येईल अशी अपेक्षा होती. परंतु २०१५ मध्ये केळीचे दर अचानक घसरले. सन २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. या कालावधीत केळीला प्रति किलोचा दर २ ते अडीच रुपये होता. याच दराने साडेतीनशे टन माल विकला तर ५० टन माल बागेतच वाया गेला. त्यानंतर मात्र पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरविले.
बदललेली पीक पध्दती
ऊसशेती
आठ एकरांत भाजीपाला
कलिंगडासाठी राखीव क्षेत्र
लॉकडाऊनमध्ये थेट विक्री यंदा आठ एकरांत लागवड होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीस सुरुवात झाली. गोव्यातील व्यापाऱ्याने २० टन माल खरेदी केला. प्रतिकिलो दहा रुपये दर मिळाला. परंतु दुसरी गाडी येण्यापूर्वीच सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. मोठा पेच निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात माल बागेत तयार झाला होता. सुरुवातीचे आठ दिवस तर विक्रीविषयी कोणतीच स्पष्ट नसल्यामुळे तब्बल ४० टन माल बागेत वाया गेला. नंतर माल विक्रीस परवानगी मिळाली. परंतु ज्या व्यापाऱ्याने संपूर्ण खरेदीची हमी घेतली होती तो गोव्यातच अडकला. अखेर दीपक यांनी दोन कामगारांना सोबत घेऊन स्थानिक गावांमध्ये टेंपो घेऊन जाऊन थेट विक्री सुरू केली. ५० टन मालाचा खप झाला. पुढे व्यापाऱ्यांनीही माल घेतला. एकूण सुमारे १७० टन विक्री झाली. सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळाला.
संपर्क- दीपक कृष्णा कासोटे, ९९६०१६७२७२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.