दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांनी प्रतिकूल हवामान, अवर्षण यांच्याशी लढा देत अनेक वर्षांच्या तपश्चर्येतून प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. निर्यातक्षम व अर्ली द्राक्ष उत्पादनात कौशल्य मिळवण्याबरोबर फळपिके, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे प्रयोग त्यांनी केले. बाजारपेठेचा अभ्यास करून कुटुंबाच्या ताकदीने बहुपीकपद्धतीतून आर्थिक स्थैर्यता मिळविली आहे. दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांच २५ एकर शेती आहे. सन १९८९ मध्ये अभियांत्रिकी पदविकेला त्यांनी प्रवेश घेतला. मात्र काही कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिले. पूर्वी बाजरी, मका, कांदा ही पिके होती. सन १९९१-९२ दरम्यान गणेश डाळिंबे, कालानुरूप बदल करत पुढे २० एकरांत आरक्ता, भगवा डाळिंबाची लागवड केली. पुढे तेलकट डाग रोगामुळे बागा काढाव्या लागल्या. दरम्यान अवर्षणग्रस्त भाग असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टॅंकर घेतले. ट्रक वाहतूक व्यवसाय केला.
संघर्षातून विस्तारली द्राक्षशेती प्रतिकूल हवामान, दुष्काळ यातून संघर्ष सुरू होताच. तेलकट डाग रोगामुळे डाळिंबाचे नुकसान झाले होते.मात्र हिंम्मत न हारता धनराज यांनी प्रयोगशीलता टिकवली होती. लग्न झाल्यानंतर ज्यांच्यासोबत सोयरीक झाली त्यांची द्राक्षशेती होती. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यातून २००८ मध्ये दोन एकरांवर द्राक्ष लागवड केली. अभ्यासवृत्ती व अनुभवाने शिकत टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र १५ एकरांवर नेले. विविध संकटांनी परीक्षा पाहिली. कधी फयान, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी यामुळे हाताशी आलेला घास वाया गेला. मात्र न डगमगता त्याच उमेदीने ते पुन्हा उभारले. विविध प्रयोगांमधून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले.
द्राक्षशेती
सिंचनस्त्रोत केले बळकट जमीन मध्यम हलक्या स्वरूपाची. त्यामुळे पिके लवकर वाफसा स्थितीवर येतात. त्यात पाण्याचा प्रश्न बिकट होता. बागायती क्षेत्राला संरक्षित सिंचन होण्यासाठी २००२ मध्ये सुमारे सव्वा एकरांत एक कोटी २५ लाख लीटर क्षमतेचे शेततळे उभारले. साडेसहा हजार फूट अंतरावरून जलवाहिनी आणली. ठिबक सिंचनही केले.
समस्येवर शोधला मार्ग मागीलवर्षी अतिवृष्टीत संपूर्ण १५ एकरांवरील हाताशी आलेली द्राक्षे मातीमोल झाली. केलेली मेहनत अन ३५ लाखांचा खर्च वाया गेला. सुमारे ७० लाखांपर्यंत अपेक्षित उत्पन्न डोळ्यासमोर संपुष्टात आले. शिल्लक द्राक्षे वाईन प्रक्रियेसाठी दिली. त्याचे अवघे नऊहजार रुपये हाती आले. अशा परिस्थितीतही हताश न होता धनराज जिद्दीने उभे राहिले. पुढील तीन-चार महिन्यांच्या काळासाठी याच द्राक्षमांडवाचा वापर करून बागेत विविध भाजीपाला घ्यायचा. त्यातून उत्पन्न मिळवायचे व नंतर द्राक्ष छाटणीकडे वळायचे असे ठरले.
शेतीतील महत्त्वपूर्ण बाबी
आईच्या स्मृतीची वास्तू निकम कुटुंब मळ्यातच राहते. आपल्या टुमदार बंगल्याला धनराज यांनी आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिच्या साखरबाई नावावरून ‘साखर’ नाव दिले आहे
शेतीतून वैभव
संपर्क- धनराज निकम: ८३२९२७९५१२ अक्षय निकम:८४११९७०८५७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.