नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) येथे राजपूत कुटुंबाची ४० एकर शेती आहे. दुष्काळी स्थितीत ठिबकद्वारे क्षेत्र ओलिताखाली आणले. केळी, कांदा, कापूस, ऊस आदी नगदी पिकांची निवड केली. केळीची निर्यातही सुरू केली. तीस गायींच्या संगोपनातून दूध, शेणखत व पूरक उत्पन्नाची सोय केली. मोठे कुटुंब व त्यातील प्रत्येकाने वाटून घेतलेली जबाबदारी, कष्ट व चोख व्यवस्थापन याद्वारे शेतीत भक्कम आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) हे जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर गिरणा नदीच्या काठावरील गाव आहे. येथील राजपूत कुटुंबामध्ये १५ सदस्य आहेत. संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. सन १९८० च्या दशकात दादाभाऊ दगाजी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाची पारंपरिक शेती बागायती झाली. सध्या नव्या पिढीतील नितेंद्र शिक्षक आहेत. मात्र, दिवसभरातील नोकरी सांभाळून सकाळी व संध्याकाळी ते नेमाने शेती कसतात. लहान चुलतभाऊ बलरामसिंग मार्केटिंग, निर्यात, विक्री या जबाबदाऱ्या सांभाळतात. नितेंद्र यांचे वडील साहेबराव, मोठे काका भिलासाहेब,आत्येभाऊ सुवर्णसिंग हे मदत करतात.
पीक पध्दतीची निवड केळी व्यवस्थापन
केळी निर्यात
कापसाचे हुकमी पीक
कांदा कपाशीनंतर कांदा घेण्यात येतो. त्याचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. चाळीत कांदा साठवला जातो. त्यामुळे बाजारपेठेतत्याला चांगला दर मिळतो.
उसाचा वापर चाऱ्यासाठी जनावरांसाठी स्वतंत्र पाच एकरांत चारापिके घेतली जातात. ज्यामध्ये शाळू, मका असतोच. शिवाय ऊसही चारा म्हणूनच घेतला जातो व त्याची विक्री केली जाते. त्याचे एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सध्या चाऱ्याला ३८०० रुपये प्रतिटन दर सुरू असल्याचे नितेंद्र यांनी सांगितले. जनजागृतीसाठी पुढाकार भिलासाहेब हे भारतीय कापूस महामंडळातून खरेदी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कापूस खरेदी विक्रीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या हित जोपासण्यासाठी त्यांनी चाळीसगावला बदली करून घेत संघटितपणे कापसाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत केले. कापूस उत्पादकांना अधिक दर देण्यासाठी तसेच गैरव्यवहार होऊ नये यासाठी त्यांचा पुढाकार असतो. गावात सर्वांशी स्नेहाचे संबंध जोपासत शेतीविकासाला हे कुटुंब अधिक प्राधान्य देते. कृषी शिक्षणाचा वसा भिलासाहेब १९७९ साली कृषी पदवीधर झाले. पुढील पिढीचे बलरामसिंग देखील कृषी पदवीधर झाले. त्यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक आदी देशांत नोकरीच्या माध्यमातून शेतमाल निर्यातीचा अभ्यास केला. याच बळावर २०१७ सालापासून कृषी निर्यातीत वाटचाल सुरू केली.
राजपूत यांच्या शेतीतील ठळक बाबी
पशुपालनाची जोड
-नितेंद्र राजपूत, ९६०४०३९६९३,
-बलराम राजपूत ८३२९४६२२०४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.