परभणी जिल्ह्यातील मांडाखळी येथील युवा शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. पाण्याचा काटेकोर वापर व आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून फळपिकांवर भर दिला. शाश्वत उत्पन्नातून गावच्या अर्थकारणाला गती मिळून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. सक्रिय लोकसहभाग, महिला तसेच शेतकरी सक्षमीकरण उपक्रमांतून गावाची वाटचाल भरीव विकासाच्या दिशेने सुरु आहे. परभणी जिल्ह्यात परभणीपासून सुमारे १२ किलोमीटरवरील मांडाखळी गावाचे नाव मांडव्य ऋषींच्या नावारुन पडले असल्याची आख्यायिका आहे. गावात त्यांचे हेमांडपंथी मंदिर आहे. त्यांच्याच नावाने १९६७ मध्ये स्थापन झालेली शैक्षणिक संस्था आहे. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
मांडाखळीची ओळख
मृदा जलसंधारणामुळे फळक्षेत्रात वाढ राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी २४ सामुहिक शेततळ्यांची निर्मिती केली आहे. संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहू लागले. त्यातून ठिबकव्दारे संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरु, लिंबू आदी फळपिकांचे उत्पादन गावातील शेतकरी आता घेत आहेत. गावात जुनी ४० हेक्टर फळबाग लागवड आहे. तीन- चार वर्षांत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत ३० हेक्टरवर फळपिकांची लागवड करण्यात आली. संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अनेक शेतकरी हळद, आले, कांदा, टोमॅटो आदींचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यातून गावाच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.
दुग्धव्यवसायाला चालना परभणी शहर जवळ असल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. म्हशीचे दररोज सुमारे ५०० लीटर दूध परभणी शहरात विक्रीसाठी जाते. काहींनी शेळीपालनाची जोड दिली आहे. एका शेतकऱ्याने डाळनिर्मिती सुरु केली आहे.
विकास अभियान गावातील शैक्षणिक,सामाजिक अशा विविध क्षेत्रातील तरुण मंडळी एकत्र आली, त्यांच्या पुढाकारातून मांडाखळी विकास अभियान संकल्पना पुढे आली. त्यातून ग्रामस्थ, नोकरदार श्रमदान करतात. यंदाच्या उन्हाळ्यात इंद्रायणी देवीच्या माळावरील खोदण्यात आलेल्या खोल सलग समतळ चरातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे माळावरून वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरत आहे. शिवारातून वाहणाऱ्या नाल्याची लांबी सुमारे १२ किलोमीटर आहे.
ठळक बाबी
शेतकरी उत्पादक कंपनीचे उपक्रम
दृष्टिक्षेपात मांडाखळी लोकसंख्या- सुमारे ५५०० एकूण क्षेत्र- २१०० हेक्टर प्रमुख पिके- सोयाबीन, कापूस, संत्रा, पेरु, सीताफळ, लिंबू जलसंधारण कामे सलग खोल समतल चर- ४० हेक्टर नाला खोलीकरण (लोकसहभागातून)- २ सामुहिक शेततळी- २४ कांदाचाळ- ९ नवीन फळबाग लागवड- ३० हेक्टर अस्तित्वातील जुनी फळबाग- ४० हेक्टर शेडनेटगृह- १० गुंठे शाळा- जिल्हा परिषद चौथीपर्यंत, त्यापुढील इयत्तांसाठी संस्था जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, तालुका कृषी अधिकारी पी.बी.बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी के.एम.जाधव, कृषी सहाय्यक कृष्णा पाटील यांचे सहकार्य
महिला सक्षमीकरण
उत्तम कापूस उत्पादन प्रकल्प
ॲग्रोवनतर्फे पुरस्कार गावातील तरुण शेतकरी विठ्ठल सिराळ यांचा शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मागीलवर्षी डिसेंबरमध्ये औरंगाबाद येथे सकाळ ॲग्रोवन तर्फे आयोजित राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनात सन्मान करण्यात आला.
प्रतिक्रिया स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी गृहउद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भरता साधली आहे. महिलांमध्ये तंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण केली जात आहे. - संजीवनी लोहट, सरपंच जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यात आली. सौर पथदिवे बसविले आहेत. अंगणवाड्या धूरमुक्त केल्या आहेत. जलसंधारणाच्या कामामुळे पाणी टंचाई दूर झाली. - सचिन लोहट- ९८२३१९२१५३ शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी कंपनीतर्फे शेतमाल विक्रीसाठी गाव ते शहर अशी विपणन साखळी बळकट करणार आहोत. - नितीन लोहट-९४२२१०९०३६ प्रवर्तक, मांडाखळी विकास अभियान
शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला, फळांची विक्री केल्याचा फायदा झाला. कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. - रमेश राऊत-९७६३०३२६९२ अध्यक्ष, मांडाखळी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी
वीस वर्षापांसून संत्रा उत्पादन घेत आहोत. यंदा दर कमी झाल्याने ती शीतगृहात ठेवली. दरात सुधारणा झाल्यानंतर विक्री केल्याचा फायदा झाला. गावात संत्रा पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. - शेख मोबीन, संत्रा उत्पादक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.