परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे (ता.परभणी) येथील साबळे बंधूंनी संयुक्त कुटूंब पध्दतीच्या जोरावर एकात्मीक शेती विकसित केली आहे. हंगामी पिकांना फळबागांची जोड व देशी सुमारे ५० गीर गायींचे संगोपन या आधारे शेतीचे अर्थकारण बळकट केले आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पूरक, प्रक्रिया उद्योग, फळबागांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतही शेती व्यवसायात टिकवून धरला आहे. परभणीपासून सुमारे १९ किलोमीटरवरील भोगाव साबळे येथील नामदेवराव देवराव साबळे यांनीही हंगामी पिके व फळबागा व त्यास दुग्धव्यवसायाची जोड या माध्यमातून एकात्मीक शेती साधून उत्पन्नाची आर्थिक बाजू भक्कम केली आहे. एकात्मीक शेतीची रचना
गीर गायींचे संगोपन सन २०१५ मध्ये गुजरातहून प्रत्येकी किमान सुमारे ५० हजार रुपये किंमतीच्या तीन गीर गायी आणल्या. साबळे यांचे शेत गावापासून एक ते दीड किलोमीटर दूर आहे. शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे ये-जा करण्यासाठी, शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी येतात. त्यामुळे गायींच्या संगोपनासाठी शेतामध्ये ५१ बाय २० फूट आकाराच्या पत्राचा गोठा उभारला. गोठ्याची काही वैशिष्ट्ये
सेंद्रिय पध्दतीचा वापर गोठयातील गोमूत्र संकलित करण्यासाठी सिमेंटचा हौद बांधला आहे. शेजारी जिवाणू कल्चर निर्मितीसाठी दोन हजार लिटर क्षमतेचा हौद बांधला आहे. ठिबक संचाव्दारे फळपिकांना जिवाणू कल्चर दिले जाते. जीवामृत, निंबोळी अर्क आदींचाही वापर होतो. त्याद्वारे जमिनीची सुरीकता वाढली आहे. शेणखत विक्री सुमारे ५० जनावरांपासून भरपूर शेणखत उपलब्ध होते. मुक्तसंचार गोठ्यात पडणारे शेण, गोमूत्र तसेच गायी, वासराच्या पायदळी तुडवले जाते. त्यातून गोखूर खत तयार होते. ते पिकांसाठी फायदेशीर ठरते. स्वतःच्या शेतात वापर करुन शिल्लक खताची विक्री होते. गेल्यावर्षी प्रति किलो १२ रुपये दराने सहा टन विक्री झाली. दूध विक्री
मसाला दूध विक्री... परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील भाडेतत्वावरीलस जागेत खवा, तूप, पनीर आदी प्रक्रिया पदार्थ निर्मिती सुरु केली आहे. मागणीनुसार ग्राहकांसाठी उत्पादने उपलब्ध केली जातात. अलिकडेच मसाला दुधाची विक्री येथून सुरु केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ती बंद आहे. फळबागांचा विकास तीन वर्षांपूर्वी पाच एकरांत जी विलास पेरुची तर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. नैसर्गिक पध्दतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षीपासून पेरुचे उत्पादन सुरु झाले आहे. गोड दर्जेदार पेरुंना ग्राहकांची पसंती असते. शेततळ्याव्दारे विहिर पुनर्भरण... विहिर सुमारे ११० फूट खोल आहे. विहिरीचे फेरभरण करण्यासाठी शेततळे खोदले आहे. शेताशेजारुन वाहणाऱ्या ओढयाचे पाणी शेततळ्यात जमा केले जाते. तेथून पाईपव्दारे विहिरीत सोडले जाते. एकोप्यांतून कामांची विभागणी कुटूंबाचा एकोपा ही साबळे यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. नामदेवराव यांचे वय ६५ वर्षे आहे. या वयातही ते मोठया उत्साहाने गायींच्या चारा-पाण्याची जबाबदारी पार पाडतात. त्या निमित्ताने हिंडणे -फिरणे होत असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्या आहेत. रामेश्वर आणि उत्तम यांच्याकडे दूध काढणे, परभणी शहरात विक्री अशी जबाबदारी आहे. विठ्ठल यांच्याकडे शेतीकामांचे नियोजन असते. दोन सालगडी आहेत. गरजेनुसार मजूर बोलावले जातात. संपर्क- रामेश्वर साबळे- ९५११२६७६३९, ९९२२६९९४३४०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.