अतिशय दुर्गम, आदिवासी अशा कोरतड (जि. पालघर) येथील विलास पाडवी यांनी नाचणी, वरई व खुरासणी या दुर्लक्षित पिकांत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी क्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले. त्याद्वारे या पिकांचे चांगले उत्पादन घेत त्यांची यशस्वी शेती करण्यासह केळीचाही परिसराला आदर्श प्रयोग केला. पडवी यांच्या प्रयोगशील व अभ्यासू शेतीची दखल सन्मान देऊन घेण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या जव्हार तालुका ठिकाणापासून वीस किलोमीटरवर कोरतड हे छोटे गाव आहे. सुमारे ५२ वर्षे वयाचे विलास सखाराम पाडवी यांचा पत्नी सौ. लता, हर्षद, सूरज ही मुले, मुलगी कांजन आणि सून सौ. भावना असा परिवार आहे. विलास पाडवी यांनी १६ वर्षे भारतीय सैन्यदलात नोकरी केली. सन २००० मध्ये सेवानिवृत झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीलाच वाहून घेतले. विलास यांची शेती
केव्हीकेने अभ्यासली गरज सन २०१० मध्ये डहाणू-कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) कोरतड गाव दत्तक घेतले. तेथील सर्वेक्षण केले. डोंगरमाथ्यावरील उथळ, हलक्या जमिनीत घेतली जाणारी नाचणी, वरई ही दुर्लक्षित तृणधान्ये असली तरी इथल्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे ते प्रमुख अन्न आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन केव्हीकेने या पिकांत आधुनिक तंत्र पुरवण्यास सुरवात केली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून सुधारीत शेती केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ भरत कुशारे यांच्याकडून विलास यांनी तंत्र आत्मसात करण्यास सुरवात केली. जव्हार तालुक्यात ३००० मिमी पाऊस पडतो. परंतु प्रदेश डोंगराळ असल्याने उन्हाळ्यात पाणी राहात नाही. अशा स्थितीत पाण्याची व्यवस्था होऊ शकणाऱ्या तीन एकर ओसाड माळरानावर विलास यांनी भाडेतत्त्वावर शेती कसण्यास घेतली. दगड गोटे, झाडेझुडपे, गवत साफ करून ती नांगरून स्वच्छ केली. वन्यजीवांचा त्रास कमी करण्यासाठी तारेचे कुंपण केले. अर्धा किलोमीटरहून धरणातून पाण्याची पाइपलाइन केली. विलास यांचे शेती व्यवस्थापन
विक्री
सुधारित तंत्रातून मिळालेले उत्पादन (एकरी)
नागली - ६ क्विं. वरई - ७ क्विं. खुरासणी - २ क्विं. भात- ड्रम सीडर पद्धत - १४ क्विं.
केळी लागवड
विलास यांनी भाडेतत्त्वावरील दुर्गम, डोंगराळ, हलक्या जमिनीत या भागात फारसे कोणी न घेतलेल्या केळीच्या ग्रॅंडनैन जातीच्या लागवडीचाही प्रयोग २०१४ पासून सुरू केला. जीवामृत, शेणखत किंवा कोंबडीखताच्या वापरावरच भर दिला. विलास यांचा आदर्श घेऊन मित्र व मेहुणे कृष्णा गवळी यांनी दोन एकर व पुढे परिसरातील १० ते १५ आदिवासी शेतकऱ्यांनी एकूण ३५ ते ४० एकरांवर केळी लागवड केली. जव्हार परिसरात केळीसाठी मायक्रोजेट वापरणे जास्त फायदेशीर असल्याचे विलास सांगतात. जोडओळ पद्धतीने ५ बाय ५ फूट व दोन जोड ओळीमध्ये आठ फूट अंतर ठेवले तर हवा खेळती राहते. उत्पादन जास्त मिळते असा त्यांचा अनुभव आहे. सरासरी प्रति घडाचे वजन ३० ते ३५ किलो तर ८ ते ९ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.
यांत्रिकीकरणावर भर विलास यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला. जव्हार भागात शेतीत यापूर्वी फारसे यांत्रिकीकरण झाले नव्हते. विलास यांनी स्वतःच्या शेतात यांत्रिकीकरणाला सुरुवात करण्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठीही भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर देण्यास सुरवात केली. त्यांच्या प्रेरणेतून परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला. विलास यांनी तलाव भाडेतत्त्वावर घेऊन रोहू, कटला, मृगळ यांचे पालन २०१४ मध्ये सुरू केले. शेती औजारे तयार करण्याचाही व्यवसाय केला.
सन्मान
- विलास पाडवी, ८८०६०३३२२१, ८६९८१५५३१४ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, डहाणू येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.