`शेतकऱ्यांची देणी आधी द्या; मगच गाळप परवाना`

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत देणी अदा केल्याशिवाय कारखान्यांना यंदा गाळप परवाना देता येणार नाही, अशी भूमिका राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांनी घेतली आहे. पण अद्यापपर्यंत कारखानदारांनी घेतलेली भूमिका, कारखानदार त्यांना कितपत दाद देतील, याबाबत शंकाच आहे.

गतवर्षी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परंतु शेतकऱ्यांनी गाळपासाठी दिलेल्या उसाच्या रकमा काही कारखान्यांनी अद्यापपर्यंत दिल्या नाहीत. सहकार खात्याने या कारखान्यांना नेहमीच मुदतवाढ देत अभय दिल्याची भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. सहकारमंत्री आणि सहकार खाते या कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.

विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १२ साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या ऊसबिलाची अंतिम रक्कम दिलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख याच जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काही शेतकरी संघटनांनी सहकारमंत्र्यांना लक्ष्य करीत त्यांच्या घरावर मोर्चे काढले आंदोलने केली. पण दोन महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष सातत्याने उफाळून येत आहे. गतवर्षीच्या उसाची रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा संघटनांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

सहकारमंत्र्यांनी आधी ५ सप्टेंबर नंतर १५ सप्टेंबरची मुदत साखर कारखानदारांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू- पाटील यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीचा हवाला देत सर्व थकीत देणी दिल्याशिवाय परवाना देणार नसल्याचे सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com