साखर कारखान्यांनी थकविली ९०० कोटींची बिले

साखर कारखान्यांनी थकविली ९०० कोटींची बिले
साखर कारखान्यांनी थकविली ९०० कोटींची बिले

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांत सुमारे ३४ लाख टन उसाचे गाळप केले. त्याची सुमारे ९०० कोटी रुपयांची बिले अद्याप शेतकऱ्यांना दिली नाहीत. पहिली उचल मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल तातडीने द्यावी, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने उसाच्या पहिल्या उचलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता. २९) धरणे आंदोलन केले.

संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार उसाचे बिल १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळणे आवश्‍यक होते. दोन महिने उलटले तरी एकाही कारखान्याने आजअखेर एक रुपयाही बिल जमा केले नाही, अशी संघटनेची तक्रार आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज वाढत आहे. एकरकमी एफआरपी मागणाऱ्या संघटनांचे नेते व साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांना वेठीस धरून फसवत आहेत. १४ दिवसांत उसाचे पैसे न देता ती वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. बाजारातील साखर व उपपदार्थांचे घसरलेले दर पाहता एकरकमी एफआरपी देता येत नाही. त्यामुळे उपलब्ध रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना देण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे.

निवेदनावर शीतल राजोबा, सुनील फराटे, किसन पाटील, मोहन परमणे, सुभाष मद्वाण्णा, बाबासाहेब पाटणे, दीपक बिरनाळे, बाबासाहेब हाके, रघुनाथ मोहिते, आप्पासाहेब हरताळे, गुणधर कर्नाळे नामदेव माळी, पांडुरंग माळी आदींच्या सह्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com