साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या 

देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी वाहने कोरोना संचारबंदीत सर्वत्र अडकून पडल्याने पेच निर्माण झाला आहे.
Sugar-Factory
Sugar-Factory

पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी वाहने कोरोना संचारबंदीत सर्वत्र अडकून पडल्याने पेच निर्माण झाला आहे. 

साखर उद्योगाने ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यांना लागणारा कच्चा माल अडकून पडल्याने अडचणी तयार झाल्या आहेत. लाईम, पॅकिंग बॅग, फॉस्फरिक ॲसिड, सल्फर असा कच्चा माल मिळत नसलेल्या कारखान्यांची माहिती गोळा केली जात आहे. 

साखर कारखान्यांचे ट्रक नेमका कोणता कच्चा माल घेऊन जात आहेत, कोणत्या ठिकाणी अडकले आहेत, त्यांना कोणत्या स्थळाकडे जायचे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे कच्चा माल नसल्याने निश्चित कोणते परिणाम भविष्यात होतील याचा अंदाज साखर उद्योगालाही बांधता आलेला नाही. 

‘‘साखर ही अत्यावश्यक वस्तू कायद्यात येते. प्रक्रिया उद्योगाला लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेले आहे. मात्र, काही राज्यांमध्ये साखर कारखान्यांच्या कच्च्या मालाच्या वाहतुकीला अडथळे आणले जात आहेत,’’ असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्रात मालवाहतुकीचे ट्रक सोडण्याचा निर्णय बुधवारी दुपारनंतर झाला. तथापि, बहुतेक ट्रकचालकांना तो सायंकाळपर्यंत माहित झालेला नव्हता. 

माहिती केंद्रसमोर मांडणार  कच्च्या मालाची वाहतूक सुरळीत न झाल्यास साखर निर्मिती व प्रक्रिया उत्पादनांवर परिणाम होतील. त्यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडू शकते. त्यामुळे आम्ही देशभरातील स्थिती संकलित करीत आहोत. ही माहिती केंद्र शासनासमोर मांडली जाईल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com