सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादन
सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८२ लाख २७ हजार २६३ टन उसाचे गाळप केले. त्यातून ९९ लाख ८७ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी १२.१४ टक्के साखर उतारा मिळाला. सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उरकला असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. त्यापैकी दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याला अवघ्या चार दिवसात हंगाम बंद करावा लागला. नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगरने जेमतेम केवळ दीड लाखाचे गाळप केले. त्यातून १४ लाख ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली साखर कारखान्यास दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पाही ओलांडता आला नाही. साखरेचे दर उतरल्याने थकीत एफआरपी न दिल्याने या कारखान्यांना वेळेत गाळप सुरू करता आले नाही. त्यामुळे गाळप कमी झाले असल्याचे चित्र आहे. 

राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनिटने विक्रमी १० लाख १४ हजार ७१९ टन उसाचे गाळप केले. १३ लाख ९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. गाळपाबरोबरच १२.९१ टक्के साखर उतारा घेऊन तोही विक्रम नोंदविल्याचे दिसते आहे. वसंतदादा साखर कारखान्यानेही प्रथमच आठ लाख ६५ हजार ९६३ टन उसाचे गाळप केले. त्यातून १० लाख १७ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

सोनहिरा, क्रांती, हुतात्मा या साखर कारखान्यांनी चांगले गाळप केले. यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप स्थिती तितकी बरी राहिली नसल्याचे चित्र पहायला मिळाले. यंदाचा हंगाम सध्या उरकला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com