अंदाजापेक्षा २० टक्के साखर उत्पादन वाढणार?

पुरामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप घटेल अशी चिन्हे होती. परंतु, सध्याचे चित्र पाहता नियमित गाळप सुरू आहे. जेवढा अंदाज होता, तितकी घट सध्या दिसत नाही. यामुळे अंदाजापेक्षा नक्कीच जास्त साखर उत्पादन होऊ शकते. - विजय औताडे, साखर तज्ज्ञ, कोल्हापूर
sugar export
sugar export

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात अंदाजापेक्षा पंधरा ते वीस टक्क्‍यांपर्यंत साखर उत्पादन वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पन्नास लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज गृहीत धरण्यात आला होता. त्यात वाढ होण्याची दाट शक्‍यता असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.  पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्रात किमान चाळीस टक्के ऊस खराब निघण्याचा अंदाज धरून यंदाच्या हंगामात साखरेला मोठा फटका बसेल असे चित्र होते. यामुळे फेब्रुवारीतच अनेक कारखान्यांचा हंगाम आटपेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, अद्यापही पश्‍चिम महाराष्ट्रात पूरबाधित उसाची तोडणी पूर्ण झालेली नाही.  यामुळे यंदाचा हंगाम पूर्णवेळ म्हणजे एप्रिलच्या प्रारंभापर्यंत चालण्याची शक्‍यता वाढली आहे. येथून फेबुवारी व मार्च महिन्यांत अंदाजापेक्षा जादा प्रमाणात साखर उत्पादित होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जानेवारी अखेर राज्यात ३३६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन ३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.  यंदा साधारणपणे साडेपाचशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. गाळप सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आत्तापर्यंत राज्यातील ३३० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ज्या वेळी हंगाम सुरू झाला त्या वेळी कारखाने कसे तरी फेब्रुवारी मध्यापर्यंत चालतील असे चित्र होते. कारखानदारांनीही याला दुजोरा दिला होता.  उसाचे सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये अजूनही पूरबाधित उसाची तोडणी सुरू आहे. वास्तविक ही तोडणी जानेवारीत संपणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही बहुतांशी ठिकाणी पूरबाधित ऊस तसाच शिल्लक आहे. पूरबाधित ऊस गाळप होत नसल्याच्या कारणावरून काही संघटना आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. एकूण पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाचा विचार केल्यास कारखाने पूर्णक्षमतेने चालत आहेत. विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अग्रेसर कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निश्‍चित चालतील, अशी सध्याची स्थिती असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.  पश्चिम महाराष्ट्रात पुर्ण क्षमतेने फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यातील फक्त ३ कारखाने बंद झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाचा विचार केल्यास कारखाने पूर्णक्षमतेने चालत आहेत. विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अग्रेसर कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निश्‍चित चालतील. एकूण हंगामाच्या सुरुवातीला साखर उत्पादनाचा जितका अंदाज व्यक्त करण्यात आला होता; त्यापेक्षा जादा साखर उत्पादन होईल, अशी चिन्हे सध्यातरी आहेत. 

प्रतिक्रिया आम्ही हंगामाच्या सुरुवातीलाच पूरबाधित क्षेत्राची माती तपासणी केली होती. यात या जमिनीत जमिनीला उपयुक्त घटक वाढल्याचे दिसले होते. याचा फायदा पुढील पिकांना होईल अशी अटकळ होती. परंतु, त्याचा फायदा गाळपास येणाऱ्या उसालाही झाला. ऊस पूर्णपणे बुडूनही जितके नुकसान अपेक्षित होते. तितके झाले नाही. अपवाद वगळता पूरबाधित क्षेत्रात केवळ दहा ते वीस टक्क्‍यांपर्यंतच उत्पादनात घट झाली आहे.  - ए. एस. पाटील, माती परीक्षण अधिकारी, दत्त साखर कारखाना, शिरोळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com